शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धुक्याने चणा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:23 IST

सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पसरलेल्या थंडीच्या लाटेने रबी पिकाला फटका बसला आहे. त्यातच धुक्याने हरभराचे पीक होरपळले आहे. केळीलाही फटका बसला आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपारा ९ अंशावर : भाजीपाल्याचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पसरलेल्या थंडीच्या लाटेने रबी पिकाला फटका बसला आहे. त्यातच धुक्याने हरभराचे पीक होरपळले आहे. केळीलाही फटका बसला आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यात तापमानाचा पारा ९ अंश सेल्सीअसपर्यंत खाली गेला आहे. ग्रामीण भागात यापेक्षाही अधिक थंडी आहे. हा प्रचंड गारवा पिकांना सहन होत नसल्याने हरभऱ्याला मोठा फटका बसण्यास सुरूवात झाली. हरभऱ्याचे पीक होरपळले आहे. हरभरा अचानक पिवळा पडल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यावर कुठल्या उपाययोजना कराव्या याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.केळीला थंडी सहन न झाल्याने पाने पिवळी पडली आहेत. भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मिरचीचा फुलोरा प्रभावित झाला आहे. मिरचीचे उत्पादन घटण्याचा धोका आहे. दरवर्षी रबी पिकांना उपयुक्त ठरणारी थंडी यंदा प्रमाणपेक्षा अधिक असल्याने घातक ठरत आहे. या परिस्थितीचा सामना कसा करावा, याबाबत कृषी विभागाकडूनही मार्गदर्शन केले जात नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती