शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

धुक्याने चणा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:23 IST

सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पसरलेल्या थंडीच्या लाटेने रबी पिकाला फटका बसला आहे. त्यातच धुक्याने हरभराचे पीक होरपळले आहे. केळीलाही फटका बसला आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपारा ९ अंशावर : भाजीपाल्याचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पसरलेल्या थंडीच्या लाटेने रबी पिकाला फटका बसला आहे. त्यातच धुक्याने हरभराचे पीक होरपळले आहे. केळीलाही फटका बसला आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यात तापमानाचा पारा ९ अंश सेल्सीअसपर्यंत खाली गेला आहे. ग्रामीण भागात यापेक्षाही अधिक थंडी आहे. हा प्रचंड गारवा पिकांना सहन होत नसल्याने हरभऱ्याला मोठा फटका बसण्यास सुरूवात झाली. हरभऱ्याचे पीक होरपळले आहे. हरभरा अचानक पिवळा पडल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यावर कुठल्या उपाययोजना कराव्या याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.केळीला थंडी सहन न झाल्याने पाने पिवळी पडली आहेत. भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मिरचीचा फुलोरा प्रभावित झाला आहे. मिरचीचे उत्पादन घटण्याचा धोका आहे. दरवर्षी रबी पिकांना उपयुक्त ठरणारी थंडी यंदा प्रमाणपेक्षा अधिक असल्याने घातक ठरत आहे. या परिस्थितीचा सामना कसा करावा, याबाबत कृषी विभागाकडूनही मार्गदर्शन केले जात नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती