शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पित्याच्या मृत्युचे दु:ख पचवून ‘ती’ बोहल्यावर चढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

२८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न गोंडवाकडी येथील आकाश कुळसंगे याच्याशी जुळले. परंतु लग्नासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्याला सतावू लागला. खरिप हंगामही तोंडावर आला. त्यामुळे बि-बियाण्याची व खताची सोय कशी लावावी, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले. नैैराश्येच्या गर्तेत तो अडकला आणि याच नैराश्येतून त्याने २६ मे रोजी सकाळी विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देसाखरा येथे पार पडला विवाह सोहळा : दोन दिवसांपूर्वीच कर्जबाजारी वडिलांनी केली होती आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : लग्नाच्या दोन दिवस अगोदर आर्थिक विवंचनेत विष प्राशन करून वडिलांनी आत्महत्या केली. मात्र विवाह सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला. मात्र तो रद्द करण्यात आला. अखेर कैै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर लग्नसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. मुलीनेही वडिलांच्या मृत्युचे दु:ख पचवून जडअंतकरणाने विवाह करण्यास संमती दिली आणि अखेर लग्नसोहळा पार पडला.ही कहानी आहे, तालुक्यातील साखरा (बु.) येथील आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्जबाजारी मारोती पुनाजी आत्राम या शेतकऱ्याची. त्याच्या नावाने चार एकर व पत्नीच्या नावाने पाच एकर शेती होती. या शेतीवर तो आपल्या कुटुंबियांची कशीबशी गुजराण करित होता. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून झालेल्या नापिकीने त्यांच्यावर बँकेचे व खासगी सावकाराचे कर्ज झाले. त्याची मुलगीही लग्नायोग्य झाली. एकीकडे कर्ज कसे फेडायचे आणि दुसरीकडे आपल्या मुलीचे लग्न कसे करायचे, अशी द्विधा परिस्थिती त्याची झाली होती.२८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न गोंडवाकडी येथील आकाश कुळसंगे याच्याशी जुळले. परंतु लग्नासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्याला सतावू लागला. खरिप हंगामही तोंडावर आला. त्यामुळे बि-बियाण्याची व खताची सोय कशी लावावी, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले. नैैराश्येच्या गर्तेत तो अडकला आणि याच नैराश्येतून त्याने २६ मे रोजी सकाळी विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे सर्वच हादरून गेले. सर्वांच्याच आनंदावर विरजण पडले. उपवर-वधू पायल व तिच्या आईच्या आक्रोशामुळे सारे गाव सुन्न झाले होते. अशा या दुर्दैवी घटनेमुळे दोन्हीकडील कुटुंबियांनी लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही बाब स्व.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना समजताच त्यांनी थेट साखरा व गोंडवाकडी ही दोन्हीही गावे गाठली. दोन्हीकडील मंडळींना समजावून सांगितले. मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी किशोर तिवारी यांनी उचलली व बुधवारी सकाळी १० वाजता गोंडवाकडी येथे आकाशच्या घरी पायल व आकाश यांचा विवाह गोंडी पद्धतीने पार पडला.किशोर तिवारी व त्यांच्या पत्नी आभा प्रकल्पाच्या अध्यक्ष स्मीता तिवारी यांनी आभा प्रकल्पाच्यावतीने संपूर्ण वºहाडी मंडळीच्या भोजनाची व्यवस्था केली. नागपूर येथील सेवा किचनचे संचालक किशोर पोचा यांनी वधू पायलच्या नावे एक लाख रूपयांची रक्कम फिक्स डिपॉझीटमध्ये टाकली.याशिवाय तहसीलदार सुरेश कव्हळे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, तालुका कृषी अधिकारी शेरखाने, पांढरकवडातील स्वस्त धान्य दुकानदार, व्यापारी व दानशूर व्यक्तींनी संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या. वधूवर आलेल्या या दु:खाच्या प्रसंगी झालेल्या तिच्या या विवाहाला शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्न