शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पित्याच्या मृत्युचे दु:ख पचवून ‘ती’ बोहल्यावर चढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

२८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न गोंडवाकडी येथील आकाश कुळसंगे याच्याशी जुळले. परंतु लग्नासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्याला सतावू लागला. खरिप हंगामही तोंडावर आला. त्यामुळे बि-बियाण्याची व खताची सोय कशी लावावी, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले. नैैराश्येच्या गर्तेत तो अडकला आणि याच नैराश्येतून त्याने २६ मे रोजी सकाळी विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देसाखरा येथे पार पडला विवाह सोहळा : दोन दिवसांपूर्वीच कर्जबाजारी वडिलांनी केली होती आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : लग्नाच्या दोन दिवस अगोदर आर्थिक विवंचनेत विष प्राशन करून वडिलांनी आत्महत्या केली. मात्र विवाह सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला. मात्र तो रद्द करण्यात आला. अखेर कैै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर लग्नसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. मुलीनेही वडिलांच्या मृत्युचे दु:ख पचवून जडअंतकरणाने विवाह करण्यास संमती दिली आणि अखेर लग्नसोहळा पार पडला.ही कहानी आहे, तालुक्यातील साखरा (बु.) येथील आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्जबाजारी मारोती पुनाजी आत्राम या शेतकऱ्याची. त्याच्या नावाने चार एकर व पत्नीच्या नावाने पाच एकर शेती होती. या शेतीवर तो आपल्या कुटुंबियांची कशीबशी गुजराण करित होता. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून झालेल्या नापिकीने त्यांच्यावर बँकेचे व खासगी सावकाराचे कर्ज झाले. त्याची मुलगीही लग्नायोग्य झाली. एकीकडे कर्ज कसे फेडायचे आणि दुसरीकडे आपल्या मुलीचे लग्न कसे करायचे, अशी द्विधा परिस्थिती त्याची झाली होती.२८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न गोंडवाकडी येथील आकाश कुळसंगे याच्याशी जुळले. परंतु लग्नासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्याला सतावू लागला. खरिप हंगामही तोंडावर आला. त्यामुळे बि-बियाण्याची व खताची सोय कशी लावावी, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले. नैैराश्येच्या गर्तेत तो अडकला आणि याच नैराश्येतून त्याने २६ मे रोजी सकाळी विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे सर्वच हादरून गेले. सर्वांच्याच आनंदावर विरजण पडले. उपवर-वधू पायल व तिच्या आईच्या आक्रोशामुळे सारे गाव सुन्न झाले होते. अशा या दुर्दैवी घटनेमुळे दोन्हीकडील कुटुंबियांनी लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही बाब स्व.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना समजताच त्यांनी थेट साखरा व गोंडवाकडी ही दोन्हीही गावे गाठली. दोन्हीकडील मंडळींना समजावून सांगितले. मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी किशोर तिवारी यांनी उचलली व बुधवारी सकाळी १० वाजता गोंडवाकडी येथे आकाशच्या घरी पायल व आकाश यांचा विवाह गोंडी पद्धतीने पार पडला.किशोर तिवारी व त्यांच्या पत्नी आभा प्रकल्पाच्या अध्यक्ष स्मीता तिवारी यांनी आभा प्रकल्पाच्यावतीने संपूर्ण वºहाडी मंडळीच्या भोजनाची व्यवस्था केली. नागपूर येथील सेवा किचनचे संचालक किशोर पोचा यांनी वधू पायलच्या नावे एक लाख रूपयांची रक्कम फिक्स डिपॉझीटमध्ये टाकली.याशिवाय तहसीलदार सुरेश कव्हळे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, तालुका कृषी अधिकारी शेरखाने, पांढरकवडातील स्वस्त धान्य दुकानदार, व्यापारी व दानशूर व्यक्तींनी संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या. वधूवर आलेल्या या दु:खाच्या प्रसंगी झालेल्या तिच्या या विवाहाला शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्न