शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

पालकमंत्र्यांच्या घरावर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:20 IST

निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या.

ठळक मुद्देमहिलांचा रूद्रावतार : अर्धा तास ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या. अर्धा तास ठिय्या देऊन बसल्यावरही पालकमंत्र्यांची भेट न झाल्याने त्या चिडल्या. शेवटी, मंत्र्यांच्या ‘पीआरओ’लाच महिलांची समजूत काढून त्यांना परत पाठवावे लागले.शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेषत: महिलावर्ग वैतागलेला आहे. डोर्लीपुऱ्यातील प्रभाग क्रमांक दोन आणि आठमध्ये महिनाभरापासून पाणी मिळणे अवघड झाले आहे. या परिसरातील बोअरही आटल्या आहेत. विहिरींची पातळी खाली गेली आहे. गेल्या महिन्यापासून तर नळालाही पाणी आलेले नाही. अशा स्थितीत एका टँकरने कसाबसा पाणीपुरवठा केला जात आहे. या एकाच टँकरवर दहा हजार लोकांची तहान कशी भागणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील महिलांनी रेटून धरली आहे.या भागाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी त्यांच्या कोट्यातील टँकरद्वारे या भागात पाणी वितरित करावे, अशी मागणी घेऊन संतप्त महिलांनी रविवारी मोर्चा काढला. हा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर धडकल्यावर घोषणाबाजी झाली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रमोदिनी रामटेके यांनी केले. यावेळी बेबी लांजेवार, बेबी राठोड, लक्ष्मी शेंद्रे, देवकाबाई वाघमारे, विनोद वाघदरे, सोनू नैताम, ज्ञानेश्वर नाकतोडे, गंगाधर खडसे, विद्या वाघदरे, देवका मराठे, शोभा ठाकरे, मंदा चिकाने, शोभा ठाकरे, गीता चौधरी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.पीआरओंनी काढली मोर्चेकºयांची समजूतधुणीभांडी, कॅटरर्स आणि रोजमजुरी करणारा वर्ग या परिसरात राहतो. त्यांनी काम करायचे की पाणी भरायचे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु, त्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी पालकमंत्रीच यावेळी उपस्थित नव्हते. त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यालाच या मोर्चेकरी महिलांची समजूत काढावी लागली. दोन दिवसात पाणी मिळेल, असे सांगितल्याने अर्धातास ठिय्या देऊन या महिला निघून गेल्या. आता त्यांना आपल्या भागात पाणी येण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई