शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरावर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:20 IST

निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या.

ठळक मुद्देमहिलांचा रूद्रावतार : अर्धा तास ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या. अर्धा तास ठिय्या देऊन बसल्यावरही पालकमंत्र्यांची भेट न झाल्याने त्या चिडल्या. शेवटी, मंत्र्यांच्या ‘पीआरओ’लाच महिलांची समजूत काढून त्यांना परत पाठवावे लागले.शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेषत: महिलावर्ग वैतागलेला आहे. डोर्लीपुऱ्यातील प्रभाग क्रमांक दोन आणि आठमध्ये महिनाभरापासून पाणी मिळणे अवघड झाले आहे. या परिसरातील बोअरही आटल्या आहेत. विहिरींची पातळी खाली गेली आहे. गेल्या महिन्यापासून तर नळालाही पाणी आलेले नाही. अशा स्थितीत एका टँकरने कसाबसा पाणीपुरवठा केला जात आहे. या एकाच टँकरवर दहा हजार लोकांची तहान कशी भागणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील महिलांनी रेटून धरली आहे.या भागाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी त्यांच्या कोट्यातील टँकरद्वारे या भागात पाणी वितरित करावे, अशी मागणी घेऊन संतप्त महिलांनी रविवारी मोर्चा काढला. हा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर धडकल्यावर घोषणाबाजी झाली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रमोदिनी रामटेके यांनी केले. यावेळी बेबी लांजेवार, बेबी राठोड, लक्ष्मी शेंद्रे, देवकाबाई वाघमारे, विनोद वाघदरे, सोनू नैताम, ज्ञानेश्वर नाकतोडे, गंगाधर खडसे, विद्या वाघदरे, देवका मराठे, शोभा ठाकरे, मंदा चिकाने, शोभा ठाकरे, गीता चौधरी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.पीआरओंनी काढली मोर्चेकºयांची समजूतधुणीभांडी, कॅटरर्स आणि रोजमजुरी करणारा वर्ग या परिसरात राहतो. त्यांनी काम करायचे की पाणी भरायचे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु, त्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी पालकमंत्रीच यावेळी उपस्थित नव्हते. त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यालाच या मोर्चेकरी महिलांची समजूत काढावी लागली. दोन दिवसात पाणी मिळेल, असे सांगितल्याने अर्धातास ठिय्या देऊन या महिला निघून गेल्या. आता त्यांना आपल्या भागात पाणी येण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई