शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

पालकमंत्र्यांच्या घरावर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:20 IST

निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या.

ठळक मुद्देमहिलांचा रूद्रावतार : अर्धा तास ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या. अर्धा तास ठिय्या देऊन बसल्यावरही पालकमंत्र्यांची भेट न झाल्याने त्या चिडल्या. शेवटी, मंत्र्यांच्या ‘पीआरओ’लाच महिलांची समजूत काढून त्यांना परत पाठवावे लागले.शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेषत: महिलावर्ग वैतागलेला आहे. डोर्लीपुऱ्यातील प्रभाग क्रमांक दोन आणि आठमध्ये महिनाभरापासून पाणी मिळणे अवघड झाले आहे. या परिसरातील बोअरही आटल्या आहेत. विहिरींची पातळी खाली गेली आहे. गेल्या महिन्यापासून तर नळालाही पाणी आलेले नाही. अशा स्थितीत एका टँकरने कसाबसा पाणीपुरवठा केला जात आहे. या एकाच टँकरवर दहा हजार लोकांची तहान कशी भागणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील महिलांनी रेटून धरली आहे.या भागाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी त्यांच्या कोट्यातील टँकरद्वारे या भागात पाणी वितरित करावे, अशी मागणी घेऊन संतप्त महिलांनी रविवारी मोर्चा काढला. हा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर धडकल्यावर घोषणाबाजी झाली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रमोदिनी रामटेके यांनी केले. यावेळी बेबी लांजेवार, बेबी राठोड, लक्ष्मी शेंद्रे, देवकाबाई वाघमारे, विनोद वाघदरे, सोनू नैताम, ज्ञानेश्वर नाकतोडे, गंगाधर खडसे, विद्या वाघदरे, देवका मराठे, शोभा ठाकरे, मंदा चिकाने, शोभा ठाकरे, गीता चौधरी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.पीआरओंनी काढली मोर्चेकºयांची समजूतधुणीभांडी, कॅटरर्स आणि रोजमजुरी करणारा वर्ग या परिसरात राहतो. त्यांनी काम करायचे की पाणी भरायचे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु, त्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी पालकमंत्रीच यावेळी उपस्थित नव्हते. त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यालाच या मोर्चेकरी महिलांची समजूत काढावी लागली. दोन दिवसात पाणी मिळेल, असे सांगितल्याने अर्धातास ठिय्या देऊन या महिला निघून गेल्या. आता त्यांना आपल्या भागात पाणी येण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई