शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आर्णीत वीजपुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:38 AM

ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग ...

ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग वेगळे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागील पाच वर्षांपूर्वी दिग्रसवरून वीजपुरवठा केला जात होता. त्यावेळीसुद्धा शहरात एवढ्या प्रमाणात पुरवठा वारंवार खंडित होत नव्हता. आता त्याहीपेक्षा जास्त वेळ पुरवठा खंडित होत आहे.

जवळा येथे १३२ केव्ही उपकेंद्र होऊनसुद्धा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीविरुद्ध रोष वाढत आहे. वितरण कंपनीचे नियोजन कुचकामी ठरले आहे. १३२ चे उपकेंद्र झाल्यावर आर्णीकर नागरिक सुखावले होते. पुरवठ्याबाबत तक्रारी निकाली लागतील, असे वाटत होते. मात्र, झाले उलटेच. उलट आता तक्रारी वाढल्या आहेत. यावरून वीज वितरण कंपनीचे धोरण चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे.

आर्णी शहर हे नावालाच उरले आहे. सुविधा ग्रामीण भागाच्याच मिळत आहे. शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. जवळा येथील १३२ केव्हीवरून आर्णी शहराला पुरवठा केला जातो. तेथूनच ३३ केव्ही येरमलहेटी, लोणबेहळ येथील ३३ केव्ही येथे पुरवठा गेला आहे. यादरम्यान कुठेही काही बिघाड झाला, तर संपूर्ण आर्णी शहर काळोखात सापडते. आर्णी शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणींचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे.

बॉक्स

तारा लोंबकळल्या, रोहित्र नादुरुस्त

शहरातील तारा लोंबकळल्या आहेत. ट्रान्सफाॅर्मर, एबी स्विचमध्ये अनेक त्रुटी आहेत. कर्मचाऱ्यांना पुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुरेसे उपकरण नसल्यामुळे त्यांची घुसमट होते. मात्र, नागरिकांच्या रोषाला त्यांनाच बळी पडावे लागते. आर्णी शहर ५० हजार लोकवस्तीचे आहे. लागूनच नागपूर- तुळजापूर महामार्ग गेला आहे. त्यामुळे शहराला मोठे महत्त्व आले. शहर वाढत असताना वीज विभागाकडून पाहिजे अशा सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने संताप आहे.