शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वाघांसह वन्यजीवांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

वाघ, वाघाचे बछडे यासह इतर वन्यजीव अभयारण्यातील रस्त्यावर अगदी सहज फिरत आहेत. वन्यजीवांची कोरोनाच्या अनुषंगाने काळजी म्हणून अभयारण्यात वनाधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीदरम्यान एका वनाधिकाऱ्याला या प्राण्यांचा मुक्तसंचार आढळून आला. सर्वत्र लॉकडाऊन असले तरी निसर्ग मात्र खुलून गेला आहे.

ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्य : गस्तीदरम्यान निसर्गाची विविध रूपे आली पुढे

प्रवीण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कोरोनाला हरविण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून आता उत्तोरोत्तर काही चांगल्याही गोष्टी पुढे येत आहेत. विशेषत: निसर्गाची विविध रूपे यानिमित्याने पहायला मिळत आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील वाघासह इतर वन्यजीव मुक्तसंचार करताना आढळून येत आहेत. अभयारण्यात गस्त करणाऱ्या वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा अनुभव येत आहे.वाघ, वाघाचे बछडे यासह इतर वन्यजीव अभयारण्यातील रस्त्यावर अगदी सहज फिरत आहेत. वन्यजीवांची कोरोनाच्या अनुषंगाने काळजी म्हणून अभयारण्यात वनाधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीदरम्यान एका वनाधिकाऱ्याला या प्राण्यांचा मुक्तसंचार आढळून आला. सर्वत्र लॉकडाऊन असले तरी निसर्ग मात्र खुलून गेला आहे.राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले.त्यात टिपेश्वर अभरण्याचाही समावेश आहे. टिपेश्वर हे देशातील वाघासाठीचे व इतर प्राण्यांचे एक नावाजलेले अभयारण्य आहे. अभरण्यात देशी, विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.या पर्यटकांच्या संपर्कात येणाºया वनाधिकारी, कर्मचाºयांना विषाणूची बाधा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अभयारण्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जंगलक्षेत्र मानव विरहित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे वातावरणात झालेल्या बदलाने तसेच मानवाचा हस्तक्षेप कमी झाल्याने अभरण्यात वाघसह इतर प्राणी मुक्तसंचार करत आहेत. तसेच पक्षी, प्राणी, वनस्पती, झाडे यांच्या बाबतीत अनेक चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही वनप्रशासनाकडून सांगितले जात आहे.टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचे नियोजन वन प्रशासनाकडून केले जात आहे. अभरण्यात वाढलेली वाघांची संख्या प्रजनानासाठी तेथील पोषक वातावरण तसेच जिल्ह्याला पर्यटनासाठी चालना देणे हा हेतू समोर ठेवून वनप्रशासन काम करीत असल्याचे सांगितले जात आहे. वन्यप्रेमीचाही या निर्णयाकडेकडे नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :forestजंगल