शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

चार वर्षानंतर नियामक मंडळाची सभा

By admin | Updated: July 3, 2014 23:48 IST

ग्रामीण विकासासाठी स्वतंत्ररीत्या नियोजन करणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियामक मंडळाची गेली चार वर्षात सभाच झाली नाही. २४ सप्टेंंबर २०११ नंतर गुरुवार ३ जुलै रोजी ही सभा झाली.

आमदार उदासीन : २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयांना कार्योत्तर मंजुरीयवतमाळ : ग्रामीण विकासासाठी स्वतंत्ररीत्या नियोजन करणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियामक मंडळाची गेली चार वर्षात सभाच झाली नाही. २४ सप्टेंंबर २०११ नंतर गुरुवार ३ जुलै रोजी ही सभा झाली. आमदारांच्या उदासीन वृत्तीमुळे ग्रामीण विकासाचा आढावाच घेण्यात आला नाही. २०१४ मध्ये झालेल्या सभेचे इतिवृत्त चार वर्षानंतर कायम करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियामक मंडळाची दर तीन महिन्यांनी सभा होणे अपेक्षित आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व विधानसभा आणि विधानपरिषद आमदार, खासदार सदस्य आहे. या दिग्गजांना वेळेच नसल्याने ही सभा नियमित झालीच नाही. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभागृहात सकाळी १०.३० वाजता नियामक मंडळाच्या सभेला सुरुवात झाली. तेव्हा चर्चेसाठी यापूर्वी म्हणजे चार वर्षाआधी झालेल्या सभेतील इतिवृत्त वाचनासाठी घेण्यात आली. विधानसभेची निवडणूक पुढे आल्याने जिल्ह्यातील आमदारांंना जाग आली असून आता ग्रामीण विकासाचा आढावा घेण्याची उपरती झाल्याचे दिसून येते. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, विधानसभा उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके, आमदार वामनराव कासावार, आमदार संदीप बाजोरिया, आमदार संजय राठोड, पुसद, यवतमाळ, राळेगाव आणि दिग्रस पंंचायत समितीचे सभापती, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, प्रकल्प अधिकारी विनय ठमके, सहायक प्रकल्प अधिकारी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, विस्तार अधिकारी व सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. या सभेत मागील सभेच्या इतिवृत्तातील तीन मुद्यांंना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये बचत गटांचे उत्पादन विक्रीसाठी जिल्हास्तरावर विक्री केंद्र, तालुका स्तरावर विक्री केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये कळंंब, राळेगाव येथे विक्री केंद्र सुरू झाले आहे. सात विक्री केंद्राचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. मात्र आता ही योजनाच बंद झाली आहे. नव्याने आलेल्या एनआरएलएम (राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान)मध्ये विक्री केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. इंदिरा आवास योजनेची कायम प्रतीक्षा यादी २००६ मध्ये तयार करण्यात आली होती. तक्रारीनंतर २००८ मध्ये त्यात थोड्याफार सुधारणा करण्यात आल्या. यानंतरही आणखी अनेक लाभार्थी वंचित आहेत. अशा लाभार्थ्यांना यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. २०१३-१४ मध्ये बीआरजीएफ (मागास प्रवर्ग विकास निधी), इंदिरा आवास योजना, एनआरएलएम यांच्या २०१३-१४ च्या आराखड्याला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. यामध्ये इंदिरा आवास योजनेचा २०१३-१४ चा ७८ कोटी ६३ लाखांचा आराखडा व २०१४-१५ चा ४१ कोटी ३६ लाखांचा एनआरएलएमचा २०१३-१४ तील २७ कोटी १० लाख आणि २०१४-१५ तील १९ कोटी ९५ लाखांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर या सभेत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. गेल्या चार वर्षात सलग तीन महिन्यानंतर नियामक मंडळाची सभा घेतली असती तर प्रत्येक योजनेची पंचायत समिती आणि गावनिहाय प्रगती जाणून घेता आली असती. मात्र उदासीन वृत्ती असलेल्या लोकप्रतिनिधींनी याची तसदीच घेतली नसल्याचे दिसून येते. आश्चर्याची बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी आमदारही एकाच माळेत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)