जिल्ह्यातील चार लघु प्रकल्प पडले कोरडे
By Admin | Updated: February 22, 2016 02:38 IST2016-02-22T02:38:57+5:302016-02-22T02:38:57+5:30
उन्हाची तीव्रता वाढताच जलसाठ्यात घसरण सुरू झाली आहे. जिल्ह्यातील चार लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.

जिल्ह्यातील चार लघु प्रकल्प पडले कोरडे
उन्हाळा : इतर प्रकल्पातही घसरण सुरू
यवतमाळ : उन्हाची तीव्रता वाढताच जलसाठ्यात घसरण सुरू झाली आहे. जिल्ह्यातील चार लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. इतर प्रकल्पातील जलसाठ्यातही घसरण सुरू झाली आहे.
जलसाठ्यात घट येण्यास सुरवात होताच प्रकल्पातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेला पाटबंधारे विभागाने सुरूवात केली आहे. त्याकरिता नियोजनही तयार केले आहे. काही ठिकाणी गाळ काढण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत अप्पर पुस प्रकल्पामध्ये केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गोखी प्रकल्पात ३७ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. वाघाडीमध्ये ४० टक्के, सायखेडा प्रकल्पात २९ टक्के तर बोरगाव प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
लोअरपूस प्रकल्पात केवळ ५६ टक्के पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील चार लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. याशिवाय साठवण तलावात पाणी शिल्लक नाही. कोल्हापुरी बंधारे आणि जलयुुक्त शिवाराच्या शेततळ्यात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. आगामी काळात आणखी तलाव आटण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)