शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एसटी-कार अपघातात चार ठार, तीन गंभीर; नेर जवळील घटना 

By सुरेंद्र राऊत | Updated: December 4, 2022 15:10 IST

यात चालक युवक व त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पाच पैकी दोन जण दगावले. इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

नेर (यवतमाळ) : नांदगाव खंडेश्वर येथील लग्नाचा स्वागत समारोह आटोपून कारने यवतमाळकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. नेर शहरालगत असलेल्या लोणीजवळ भरधाव कार एसटी बसला धडकली. हा अपघात रविवारी सकाळी १०.३० वाजता घडला. यात चालक युवक व त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पाच पैकी दोन जण दगावले. इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

अभियंता राधेश्याम अशोक इंगोले (२६), त्याची आई रजनी अशोक इंगोले (४५) दोघे (रा. रुपनगर वडगाव रोड, यवतमाळ) वैष्णवी संतोष गावंडे (१८), सारिका प्रमोद चौधरी (२८) (रा. पिंपळगाव जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत. साक्षी प्रमोद चौधरी (१९), प्रमोद पांडुरंग चौधरी (४५), सविता संतोष गावंडे (४४) हे तिघेही गंभीर जखमी आहे. एसटी बसमध्ये असलेले सचिन शेंद्रे, धनंजय मिटकरी हे दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

राळेगाव आगाराची बस यवतमाळवरून अमरावतीला जात होती. तर एमएच-२९-बीसी-९१७३ या कारमधून तीन कुटुंबातील सात जण यवतमाळकडे येत होते. कार समोरासमोर एसटी बसवर धडकली. या भीषण अपघातात कार चालवित असलेला अभियंता राधेश्याम इंगोले, त्याची आई रजनी इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर यवतमाळ रुग्णालयात उपचारादरम्यान वैष्णवी गावंडे व सारिका चौधरी या दोघी दगावल्या. अपघातानंतर तातडीने मदत पोहोचविण्यात आली. नेर येथील रुग्णसेवक शंकर भागडकर, नाना घोंगडे, राजेश खोडके, प्रमोद राणे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने नेर शासकीय रुग्णालयात आणले. तेथून यवतमाळ येथील रुग्णालयात पोहोचविण्यात आले. यवतमाळात जखमींवर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी दोन महिलांना नागपूर रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात परिसरात तीनही परिवारातील सदस्य आपला शोक व्यक्त करीत होते. 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलYavatmalयवतमाळnagpurनागपूर