शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 23:11 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यांनी भूदान यज्ञात स्वत:ला झोकून दिले होते.

 यवतमाळ : गांधीवादी आणि ज्येष्ठ सर्वोदयी नेते माजी खासदार सदाशिवराव बापूजी ठाकरे यांचे मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी इंझाळा (ता.घाटंजी) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 

सकाळी ९ वाजतापर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या येथील राणाप्रतापनगरातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सदाशिवराव ठाकरे यांच्या मागे पत्नी अन्नपूर्णा, मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र, सरोज चौधरी, रागिनी गावंडे, डॉ. मंगला निकम या मुली व मोठा आप्त परिवार आहे.सदाशिवराव ठाकरे यवतमाळचे आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचेही अध्यक्ष राहिलेले आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासूनच त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले. विद्यार्थी काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यांनी भूदान यज्ञात स्वत:ला झोकून दिले. विशेष म्हणजे, स्वकुटुंबातील ८० एकर जमीन दान दिली. भूदान पदयात्रेत प्रचंड पायपीट त्यांनी केली. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा राजकीय सहवास त्यांना लाभला. हरित क्रांतीचा पुरस्कार आणि प्रसारासाठी त्यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्राचा व्यक्ती पंतप्रधानपदी पाहणे ही अंतिम इच्छा सदाशिवराव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. 

‘सिद्धांत’मधून कार्याचा लेखाजोखामाजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांनी ‘सिद्धांत’ या आत्मचरित्रात त्यांच्या राजकीय-सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला आहे. ‘पावले चालती पंढरीची वाट’ या आत्मकथेत त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय ते राजकारणातून निवृत्तीच्या निर्णयापर्यंतचे प्रवास वर्णन केले आहे.

अल्प परिचयनाव : सदाशिवराव बापूजी ठाकरे जन्म : १४ जून १९२५, इंझाळा, ता.घाटंजी, जि.यवतमाळशिक्षण : बी.कॉम. (नागपूर)विवाह : २१ जून १९५१ (पत्नी अन्नपूर्णा)१९६७ : यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष१९७१ : खासदार, यवतमाळ लोकसभा मतदारसंघ१९७८ : यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष१९८५ : आमदार, यवतमाळ विधानसभा मतदारसंघयवतमाळ जिल्ह्याचे पितृत्त्व हरविलेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदाशिवराव ठाकरे आयुष्याच्या शेवटपर्यंत कमालीचे सक्रिय होते. त्यांच्यातील उत्साह व सक्रियता तरुणांनाही लाजविणारी होती. अलीकडेच झालेल्या भेटीच्यावेळी त्यांनी आपण वयाची शंभरी गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. ‘काका, तुम्ही वयाची सेंच्यूरी गाठा, आपण शतकपूर्तीचा दमदार सोहळा आयोजित करू’, असे मी त्यांना सांगितले होते. परंतु क्रिकेटमध्ये शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच क्लिन बोल्ड व्हावे तसे सदाशिवराव वयाच्या ९७ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. ते संपूर्ण आयुष्य साधेपणाने जगले. विनोबाजींच्या भूदान चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या मनावर विनोबाजींचा व सर्वोदयी विचारांचा पगडा होता. ते विनोबाजींच्या चळवळीतील आठवणी नेहमीच सांगत. ते मुरब्बी राजकारणी होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार व्हावे, ही बाबूजींची इच्छा होती व त्यासाठी ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहायचे. सदाशिवराव खासदार असताना त्यांचे दिल्लीतील घर म्हणजे ‘लोकमत’चे कार्यालय होते. त्यांचे दर्डा परिवार आणि ‘लोकमत’ सोबत अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. आयुष्यभर त्यांनी सर्वसामान्य व गरिबांच्या विकासाचा ध्यास घेतला होता. जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांची कमालीची धडपड होती. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात पितृतूल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आधार होता. परंतु त्यांच्या निधनाने यवतमाळ जिल्ह्याचे पितृत्व हरविले आहे. त्यांची उणीव जिल्ह्याला सदैव जाणवत राहील. सदाशिवरावांचे पुत्र जितेंद्र यांच्याशी संपर्क करून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.- विजय दर्डा, माजी खासदार तथा चेअरमन, लोकमत मीडिया प्रा.लि.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ