शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

महागावात पाच हजार हेक्टर सिंचन कागदावरच

By admin | Updated: November 10, 2014 22:50 IST

तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही.

महागाव : तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही. केवळ चार हजार हेक्टरवर सिंचनाचा दावा केला जात असून अद्यापही पाच हजार हेक्टर सिंचन कागदावरच दिसत आहे. २० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे. महागाव तालुक्यातील वेणी येथे अधर पूस प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावर्षी या प्रकल्पात पुरेसे पाणी आहे. परंतु अद्यापही टेलपर्यंत पाणीच पोहोचत नाही. नऊ हजार सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने ओलितच झाले नाही. धरणाच्या निर्मितीपासून कालवे आणि त्या अनुषंगाने सर्व गेट, सिमेंट प्लग आदींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. उपविभागीय प्रकल्प अधिकारी अरुण कलवले आणि शाखा अभियंता अरविंद भगत यांनी गत वर्षी २० कोटी रुपये दुरुस्ती देखभाल खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला. परंतु त्यावर लोकप्रतिनिधींकडून कोणताच पाठपुरावा झाला नाही. तो प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे.धरण निर्मितीनंतर कालवे सिमेंट प्लग, गेट आदी कामांसाठी पुरेसा निधीच देण्यात आला नाही. जी काही कामे हाती घेतली जातात. ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे. कायमस्वरूपी कालवे दुरुस्ती, सिमेंट लायनिंग, गेट दुरुस्ती होत नसल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. हे वास्तव असून शेतकऱ्यांना जीवंत ठेवण्यासाठी ओलिताची सुविधा देणे गरजेचे आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, हरभरा, गहू, ज्वारी, भुईमुग आदी पिके घेतली जातात. साधारणत: ८० टक्के नागरिकांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना या धरणाकडून मोठ्या अपेक्षा आहे. परंतु धरणाचे पाणी मिळत नाही. विजेची समस्याही कायम आहे. यंदा मुबलक पाणी साठा असूनही ते केव्हा मिळेल याची खात्री नाही. पाटबंधारे विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत रबीला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेल तोच खरा दिवस. (शहर प्रतिनिधी)