शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

महागावात पाच हजार हेक्टर सिंचन कागदावरच

By admin | Updated: November 10, 2014 22:50 IST

तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही.

महागाव : तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही. केवळ चार हजार हेक्टरवर सिंचनाचा दावा केला जात असून अद्यापही पाच हजार हेक्टर सिंचन कागदावरच दिसत आहे. २० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे. महागाव तालुक्यातील वेणी येथे अधर पूस प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावर्षी या प्रकल्पात पुरेसे पाणी आहे. परंतु अद्यापही टेलपर्यंत पाणीच पोहोचत नाही. नऊ हजार सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने ओलितच झाले नाही. धरणाच्या निर्मितीपासून कालवे आणि त्या अनुषंगाने सर्व गेट, सिमेंट प्लग आदींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. उपविभागीय प्रकल्प अधिकारी अरुण कलवले आणि शाखा अभियंता अरविंद भगत यांनी गत वर्षी २० कोटी रुपये दुरुस्ती देखभाल खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला. परंतु त्यावर लोकप्रतिनिधींकडून कोणताच पाठपुरावा झाला नाही. तो प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे.धरण निर्मितीनंतर कालवे सिमेंट प्लग, गेट आदी कामांसाठी पुरेसा निधीच देण्यात आला नाही. जी काही कामे हाती घेतली जातात. ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे. कायमस्वरूपी कालवे दुरुस्ती, सिमेंट लायनिंग, गेट दुरुस्ती होत नसल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. हे वास्तव असून शेतकऱ्यांना जीवंत ठेवण्यासाठी ओलिताची सुविधा देणे गरजेचे आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, हरभरा, गहू, ज्वारी, भुईमुग आदी पिके घेतली जातात. साधारणत: ८० टक्के नागरिकांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना या धरणाकडून मोठ्या अपेक्षा आहे. परंतु धरणाचे पाणी मिळत नाही. विजेची समस्याही कायम आहे. यंदा मुबलक पाणी साठा असूनही ते केव्हा मिळेल याची खात्री नाही. पाटबंधारे विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत रबीला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेल तोच खरा दिवस. (शहर प्रतिनिधी)