शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

महागावात पाच हजार हेक्टर सिंचन कागदावरच

By admin | Updated: November 10, 2014 22:50 IST

तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही.

महागाव : तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही. केवळ चार हजार हेक्टरवर सिंचनाचा दावा केला जात असून अद्यापही पाच हजार हेक्टर सिंचन कागदावरच दिसत आहे. २० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे. महागाव तालुक्यातील वेणी येथे अधर पूस प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावर्षी या प्रकल्पात पुरेसे पाणी आहे. परंतु अद्यापही टेलपर्यंत पाणीच पोहोचत नाही. नऊ हजार सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने ओलितच झाले नाही. धरणाच्या निर्मितीपासून कालवे आणि त्या अनुषंगाने सर्व गेट, सिमेंट प्लग आदींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. उपविभागीय प्रकल्प अधिकारी अरुण कलवले आणि शाखा अभियंता अरविंद भगत यांनी गत वर्षी २० कोटी रुपये दुरुस्ती देखभाल खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला. परंतु त्यावर लोकप्रतिनिधींकडून कोणताच पाठपुरावा झाला नाही. तो प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे.धरण निर्मितीनंतर कालवे सिमेंट प्लग, गेट आदी कामांसाठी पुरेसा निधीच देण्यात आला नाही. जी काही कामे हाती घेतली जातात. ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे. कायमस्वरूपी कालवे दुरुस्ती, सिमेंट लायनिंग, गेट दुरुस्ती होत नसल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. हे वास्तव असून शेतकऱ्यांना जीवंत ठेवण्यासाठी ओलिताची सुविधा देणे गरजेचे आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, हरभरा, गहू, ज्वारी, भुईमुग आदी पिके घेतली जातात. साधारणत: ८० टक्के नागरिकांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना या धरणाकडून मोठ्या अपेक्षा आहे. परंतु धरणाचे पाणी मिळत नाही. विजेची समस्याही कायम आहे. यंदा मुबलक पाणी साठा असूनही ते केव्हा मिळेल याची खात्री नाही. पाटबंधारे विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत रबीला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेल तोच खरा दिवस. (शहर प्रतिनिधी)