शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
3
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
4
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
5
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
6
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
7
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
8
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
9
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
10
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
13
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
14
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
15
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
16
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
17
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
18
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
19
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
20
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात

बीटी बियाणे दरात पाच टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST

बियाणे कंपन्यांकडून दरात वाढीची मागणी होती. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकार स्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला. सध्या बीजी- १ तंत्रज्ञान ...

बियाणे कंपन्यांकडून दरात वाढीची मागणी होती. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकार स्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला. सध्या बीजी- १ तंत्रज्ञान रॉयल्टीविना उपलब्ध करून दिले जात आहे. बीजी- २ वरील रॉयल्टीची आकारणी मात्र कायम आहे. गेल्या वर्षींच्या हंगामात बीजी-१ कपाशी बियाण्याचे पाकीट ६३० रुपयांना, तर बीजी-२ चे पाकीट ७३० रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यावर्षी बीटी बियाणे पाकीट दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. आता बीजी-१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना, तर बीजी-२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली आहे.

बियाणे कंपन्यांकडून दरवाढीचे स्वागत करण्यात आले. या माध्यमातून संशोधन आणि विकास कार्यासाठी पैसा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर तालुक्यातील ज्येष्ठ कापूस अभ्यासक व ‘अमृत पॅटर्न’चे जनक अमृतराव देशमुख यांनी महाराष्ट्रात ४२ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होते असे सांगून त्यात ९५ टक्के बीटी बियाणे असल्याचे स्पष्ट केले. एकरी दोन पाकिटांची गरज राहते. त्यानुसार सरासरी १ कोटी ५० लाख पाकिटे महाराष्ट्रात विकली जातात. गेल्या वर्षी ३५ लाख पाकिटे हरबींसाइड टॉलरंट (तणाला प्रतिकारक) बियाण्याची अनधिकृतपणे विकली गेली, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचा बियाणे कंपन्यांना मोठा फटका बसला. नव्या दरवाढीमुळे कंपन्यांना दिलासा मिळाला असला, तरी कापूस उत्पादन खर्चात मात्र वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून बोंडअळी आल्याचे कृषी विद्यापीठातील संशोधक सांगतात. मात्र, बोंडअळी नाही तर ती बोंड सड आहे, हे वास्तव कृषी विद्यापीठाचे अधिकारी मानायला तयार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांचे पिकाबाबतचे आकलन कमी पडत असल्यामुळे स्वतःचे अज्ञान लपवण्यासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञ माझ्यासारख्या कृषी संशोधकाला खोटं ठरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला. मी केलेल्या सूचना महाराष्ट्र शासन वगळता गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी स्वीकारल्या. कोणताही सामान्य शेतकरी पिकाचे एवढे सूक्ष्म नियोजन करू शकत नाही. त्या संधीचा लाभ घेऊन कृषी विद्यापीठाचे अधिकारी, स्थानिक कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या माथी अपयशाचे खापर फोडत आले आहे. कपाशी आणि सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी बोगस बियाणे व आलेल्या रोगामुळे प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. रोगाचे योग्य निदान होत नाही. कापूस पेरा कमी होणे हे राष्ट्राच्या हिताकरिता चांगले नाही. मात्र, दुर्दैवाने तो कमी होताना दिसत आहे. हे अपयश कृषी विभागाचे असल्याचा आरोप अमृतराव देशमुख यांनी केला आहे.

बॉक्स

तालुक्याला यंदा लक्ष्यांक मिळणार

कपाशी हे पीक खर्चिक पीक झाले आहे. सोयाबीनवर येणारे रोग पाहता शेतकऱ्यांचा कल अन्य पिकांकडे वळला आहे. उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कोरोनामुळे कृषी विभागाला लक्ष्यांक देण्यात आले नव्हते. यंदा ते मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी सांगितले.