शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

बीटी बियाणे दरात पाच टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST

बियाणे कंपन्यांकडून दरात वाढीची मागणी होती. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकार स्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला. सध्या बीजी- १ तंत्रज्ञान ...

बियाणे कंपन्यांकडून दरात वाढीची मागणी होती. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकार स्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला. सध्या बीजी- १ तंत्रज्ञान रॉयल्टीविना उपलब्ध करून दिले जात आहे. बीजी- २ वरील रॉयल्टीची आकारणी मात्र कायम आहे. गेल्या वर्षींच्या हंगामात बीजी-१ कपाशी बियाण्याचे पाकीट ६३० रुपयांना, तर बीजी-२ चे पाकीट ७३० रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यावर्षी बीटी बियाणे पाकीट दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. आता बीजी-१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना, तर बीजी-२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली आहे.

बियाणे कंपन्यांकडून दरवाढीचे स्वागत करण्यात आले. या माध्यमातून संशोधन आणि विकास कार्यासाठी पैसा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर तालुक्यातील ज्येष्ठ कापूस अभ्यासक व ‘अमृत पॅटर्न’चे जनक अमृतराव देशमुख यांनी महाराष्ट्रात ४२ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होते असे सांगून त्यात ९५ टक्के बीटी बियाणे असल्याचे स्पष्ट केले. एकरी दोन पाकिटांची गरज राहते. त्यानुसार सरासरी १ कोटी ५० लाख पाकिटे महाराष्ट्रात विकली जातात. गेल्या वर्षी ३५ लाख पाकिटे हरबींसाइड टॉलरंट (तणाला प्रतिकारक) बियाण्याची अनधिकृतपणे विकली गेली, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचा बियाणे कंपन्यांना मोठा फटका बसला. नव्या दरवाढीमुळे कंपन्यांना दिलासा मिळाला असला, तरी कापूस उत्पादन खर्चात मात्र वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून बोंडअळी आल्याचे कृषी विद्यापीठातील संशोधक सांगतात. मात्र, बोंडअळी नाही तर ती बोंड सड आहे, हे वास्तव कृषी विद्यापीठाचे अधिकारी मानायला तयार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांचे पिकाबाबतचे आकलन कमी पडत असल्यामुळे स्वतःचे अज्ञान लपवण्यासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञ माझ्यासारख्या कृषी संशोधकाला खोटं ठरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला. मी केलेल्या सूचना महाराष्ट्र शासन वगळता गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी स्वीकारल्या. कोणताही सामान्य शेतकरी पिकाचे एवढे सूक्ष्म नियोजन करू शकत नाही. त्या संधीचा लाभ घेऊन कृषी विद्यापीठाचे अधिकारी, स्थानिक कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या माथी अपयशाचे खापर फोडत आले आहे. कपाशी आणि सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी बोगस बियाणे व आलेल्या रोगामुळे प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. रोगाचे योग्य निदान होत नाही. कापूस पेरा कमी होणे हे राष्ट्राच्या हिताकरिता चांगले नाही. मात्र, दुर्दैवाने तो कमी होताना दिसत आहे. हे अपयश कृषी विभागाचे असल्याचा आरोप अमृतराव देशमुख यांनी केला आहे.

बॉक्स

तालुक्याला यंदा लक्ष्यांक मिळणार

कपाशी हे पीक खर्चिक पीक झाले आहे. सोयाबीनवर येणारे रोग पाहता शेतकऱ्यांचा कल अन्य पिकांकडे वळला आहे. उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कोरोनामुळे कृषी विभागाला लक्ष्यांक देण्यात आले नव्हते. यंदा ते मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी सांगितले.