शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बारा दिवसात पाच जणांचा खून, गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 13:13 IST

नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे.

ठळक मुद्देरक्तपात वाढताेयसामाजिक स्वास्थ्य बिघडल्याची लक्षणं

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून थेट जीवानीशी ठार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर ताे आणखी गंभीर रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.

नाेव्हेंबर महिन्यातील खुनाचे सत्र हे १० तारखेपासून सुरू झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांचा काेणतेही कारण नसताना चाकूने भाेसकून खून झाला. यातील आराेपी अटक हाेत नाही ताेच शहरातील आर्णी मार्गावर एकाने वकिलावर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने यात वकील हर्षवर्धन देशमुख हे बचावले. यातील आराेपी अजूनही पाेलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शाेध सुरूच असून आराेपी अटकपूर्व जामिनासाठी धडपड करत आहे.

या दाेन्ही घटनेनंतर दिग्रस शहरालगत सावंगी बु. येथे पूजा अनिल कावळे या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पूजाची ओळख पटवून पाेलिसांनी तिच्या पतीसह चार जणांना अटक केली. त्याचपाठाेपाठ कळंब तालुक्यातील तिरझडा येथील विवाहित तरुणाचे घरून अपहरण करण्यात आले. त्याचा दाेन दिवसांनी वडकी शिवारात वर्धा नदीपात्रात मृतदेह आढळला. कळंब, वडकी आणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारही बाजूने तपास करत आराेपींना हुडकून काढले. यात आठ जणांना अटक करण्यात आली. मुलीला छेडत असल्यावरून हा खून झाला.

घंटीबाबा यात्रेतही झाली होती हाणामारी

दिग्रस शहरात ऑक्टाेबर महिन्यात घंटीबाबा यात्रेत दाेन गटात हाणामारी झाली. यात पाेलीस दफ्तरी अनेक गुन्हे शिरावर असलेला शिनू गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी १८ नाेव्हेंबर राेजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणीसुध्दा दिग्रस पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आराेपींना पाेलिसांनी पूर्वीच अटक केली हाेती.

पुसद शहरात जुन्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली. चार महिन्यांपूर्वीच मारेकऱ्यांनी मृतकाला धमकी दिली हाेती. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली. पाेलिसांनी यातील आराेपींना अटक केली आहे.

या सर्व घटनांमुळे नाेव्हेंबर महिना गाजत आहे. जिल्ह्यात सुरू असलेले खुनाचे सत्र थांबणार कधी व कसे याचे उत्तर मात्र काेणाकडेच नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी