शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जिल्ह्यात बारा दिवसात पाच जणांचा खून, गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 13:13 IST

नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे.

ठळक मुद्देरक्तपात वाढताेयसामाजिक स्वास्थ्य बिघडल्याची लक्षणं

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून थेट जीवानीशी ठार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर ताे आणखी गंभीर रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.

नाेव्हेंबर महिन्यातील खुनाचे सत्र हे १० तारखेपासून सुरू झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांचा काेणतेही कारण नसताना चाकूने भाेसकून खून झाला. यातील आराेपी अटक हाेत नाही ताेच शहरातील आर्णी मार्गावर एकाने वकिलावर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने यात वकील हर्षवर्धन देशमुख हे बचावले. यातील आराेपी अजूनही पाेलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शाेध सुरूच असून आराेपी अटकपूर्व जामिनासाठी धडपड करत आहे.

या दाेन्ही घटनेनंतर दिग्रस शहरालगत सावंगी बु. येथे पूजा अनिल कावळे या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पूजाची ओळख पटवून पाेलिसांनी तिच्या पतीसह चार जणांना अटक केली. त्याचपाठाेपाठ कळंब तालुक्यातील तिरझडा येथील विवाहित तरुणाचे घरून अपहरण करण्यात आले. त्याचा दाेन दिवसांनी वडकी शिवारात वर्धा नदीपात्रात मृतदेह आढळला. कळंब, वडकी आणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारही बाजूने तपास करत आराेपींना हुडकून काढले. यात आठ जणांना अटक करण्यात आली. मुलीला छेडत असल्यावरून हा खून झाला.

घंटीबाबा यात्रेतही झाली होती हाणामारी

दिग्रस शहरात ऑक्टाेबर महिन्यात घंटीबाबा यात्रेत दाेन गटात हाणामारी झाली. यात पाेलीस दफ्तरी अनेक गुन्हे शिरावर असलेला शिनू गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी १८ नाेव्हेंबर राेजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणीसुध्दा दिग्रस पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आराेपींना पाेलिसांनी पूर्वीच अटक केली हाेती.

पुसद शहरात जुन्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली. चार महिन्यांपूर्वीच मारेकऱ्यांनी मृतकाला धमकी दिली हाेती. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली. पाेलिसांनी यातील आराेपींना अटक केली आहे.

या सर्व घटनांमुळे नाेव्हेंबर महिना गाजत आहे. जिल्ह्यात सुरू असलेले खुनाचे सत्र थांबणार कधी व कसे याचे उत्तर मात्र काेणाकडेच नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी