शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

जिल्ह्यात बारा दिवसात पाच जणांचा खून, गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 13:13 IST

नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे.

ठळक मुद्देरक्तपात वाढताेयसामाजिक स्वास्थ्य बिघडल्याची लक्षणं

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून थेट जीवानीशी ठार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर ताे आणखी गंभीर रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.

नाेव्हेंबर महिन्यातील खुनाचे सत्र हे १० तारखेपासून सुरू झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांचा काेणतेही कारण नसताना चाकूने भाेसकून खून झाला. यातील आराेपी अटक हाेत नाही ताेच शहरातील आर्णी मार्गावर एकाने वकिलावर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने यात वकील हर्षवर्धन देशमुख हे बचावले. यातील आराेपी अजूनही पाेलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शाेध सुरूच असून आराेपी अटकपूर्व जामिनासाठी धडपड करत आहे.

या दाेन्ही घटनेनंतर दिग्रस शहरालगत सावंगी बु. येथे पूजा अनिल कावळे या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पूजाची ओळख पटवून पाेलिसांनी तिच्या पतीसह चार जणांना अटक केली. त्याचपाठाेपाठ कळंब तालुक्यातील तिरझडा येथील विवाहित तरुणाचे घरून अपहरण करण्यात आले. त्याचा दाेन दिवसांनी वडकी शिवारात वर्धा नदीपात्रात मृतदेह आढळला. कळंब, वडकी आणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारही बाजूने तपास करत आराेपींना हुडकून काढले. यात आठ जणांना अटक करण्यात आली. मुलीला छेडत असल्यावरून हा खून झाला.

घंटीबाबा यात्रेतही झाली होती हाणामारी

दिग्रस शहरात ऑक्टाेबर महिन्यात घंटीबाबा यात्रेत दाेन गटात हाणामारी झाली. यात पाेलीस दफ्तरी अनेक गुन्हे शिरावर असलेला शिनू गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी १८ नाेव्हेंबर राेजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणीसुध्दा दिग्रस पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आराेपींना पाेलिसांनी पूर्वीच अटक केली हाेती.

पुसद शहरात जुन्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली. चार महिन्यांपूर्वीच मारेकऱ्यांनी मृतकाला धमकी दिली हाेती. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली. पाेलिसांनी यातील आराेपींना अटक केली आहे.

या सर्व घटनांमुळे नाेव्हेंबर महिना गाजत आहे. जिल्ह्यात सुरू असलेले खुनाचे सत्र थांबणार कधी व कसे याचे उत्तर मात्र काेणाकडेच नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी