शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जिल्ह्यात बारा दिवसात पाच जणांचा खून, गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 13:13 IST

नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे.

ठळक मुद्देरक्तपात वाढताेयसामाजिक स्वास्थ्य बिघडल्याची लक्षणं

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून थेट जीवानीशी ठार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर ताे आणखी गंभीर रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.

नाेव्हेंबर महिन्यातील खुनाचे सत्र हे १० तारखेपासून सुरू झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांचा काेणतेही कारण नसताना चाकूने भाेसकून खून झाला. यातील आराेपी अटक हाेत नाही ताेच शहरातील आर्णी मार्गावर एकाने वकिलावर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने यात वकील हर्षवर्धन देशमुख हे बचावले. यातील आराेपी अजूनही पाेलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शाेध सुरूच असून आराेपी अटकपूर्व जामिनासाठी धडपड करत आहे.

या दाेन्ही घटनेनंतर दिग्रस शहरालगत सावंगी बु. येथे पूजा अनिल कावळे या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पूजाची ओळख पटवून पाेलिसांनी तिच्या पतीसह चार जणांना अटक केली. त्याचपाठाेपाठ कळंब तालुक्यातील तिरझडा येथील विवाहित तरुणाचे घरून अपहरण करण्यात आले. त्याचा दाेन दिवसांनी वडकी शिवारात वर्धा नदीपात्रात मृतदेह आढळला. कळंब, वडकी आणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारही बाजूने तपास करत आराेपींना हुडकून काढले. यात आठ जणांना अटक करण्यात आली. मुलीला छेडत असल्यावरून हा खून झाला.

घंटीबाबा यात्रेतही झाली होती हाणामारी

दिग्रस शहरात ऑक्टाेबर महिन्यात घंटीबाबा यात्रेत दाेन गटात हाणामारी झाली. यात पाेलीस दफ्तरी अनेक गुन्हे शिरावर असलेला शिनू गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी १८ नाेव्हेंबर राेजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणीसुध्दा दिग्रस पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आराेपींना पाेलिसांनी पूर्वीच अटक केली हाेती.

पुसद शहरात जुन्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली. चार महिन्यांपूर्वीच मारेकऱ्यांनी मृतकाला धमकी दिली हाेती. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली. पाेलिसांनी यातील आराेपींना अटक केली आहे.

या सर्व घटनांमुळे नाेव्हेंबर महिना गाजत आहे. जिल्ह्यात सुरू असलेले खुनाचे सत्र थांबणार कधी व कसे याचे उत्तर मात्र काेणाकडेच नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी