शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 11:15 IST

कर्जवाटप केवळ ४५ टक्के : नापिकी, कर्जवाटप थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील दोन दिवसांत विदर्भात पाच शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि भंडारा जिल्ह्यात एका घटनेचा समावेश आहे. यामागे गतवर्षी झालेली नापिकी, न मिळालेली मदत आणि या वर्षी बँकांनी रोखलेले कर्जवाटप आदी कारणे असल्याचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

मागील ४८ तासांत विनोद ढोरे (रा.दाभेविरली, जि.भंडारा), भोजराज राऊत (रा.चोरटी) व नीलकंठ प्रधान (रा.रणमोचन), जि. चंद्रपूर, बन्सी पवार (रा. गांधीनगर) व दादाराव बोबडे (रा. गगनमाळ) जि. यवतमाळ या पाच जणांनी आत्महत्या केली. या वर्षी जूनपर्यंत पश्चिम विदर्भात ६९४, तर पूर्व विदर्भात २२८ शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली. 

विदर्भात आतापर्यंत केवळ ४५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. मागील हंगामात प्रचंड नापिकी झाली, कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही. त्यातच दुष्काळ घोषित करण्यात केला नाही. पीकविमाही समाधानकारक मिळाला नाही. यामुळे पश्चिम विदर्भापाठोपाठ आता पूर्व विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.

अमरावतीत पाच महिन्यांत १४३ घटनामागील तीन वर्षातील सरकारी आकडेवारीनुसार, अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत चालला आहे. या वर्षी मे महिन्यापर्यंत अमरावती जिल्ह्यात १४३ शेतकरी आत्महत्या झाल्या. अमरावती जिल्ह्यात लागवडीखाली कापूस आणि सोयाबीनचा पट्टाही आहे. या जिल्ह्याच्या काही भागात नागपूर संत्र्याचीही लागवड होते. यवतमाळ जिल्ह्यात मे २०२४ पर्यंत १३२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी २०१५ ते २०२१ पर्यंत एकात्मिक कार्यक्रम सरकारकडे सादर करण्यात आला होता, अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भ