शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

आधी श्रमदान, नंतरच सप्तपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:12 PM

तालुक्यातील आंधबोरी आणि नांझा ही अतिशय छोटीशी गावे. डोंगरदऱ्या व जंगलाने वेढलेल्या या गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली. पाणीटंचाईतून कायमची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण गावाने चंग बांधला.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त गावे : आंधबोरी व नांझा येथे सामूहिक प्रयत्न

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील आंधबोरी आणि नांझा ही अतिशय छोटीशी गावे. डोंगरदऱ्या व जंगलाने वेढलेल्या या गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली. पाणीटंचाईतून कायमची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण गावाने चंग बांधला. यासाठी सामूहिक श्रमदान सुरूझाले. श्रमदानात नित्यनेमाने सहभागी होणाºया नव वर-वधूंनी लग्नाच्या दिवशीही श्रमदान करुन आपला विवाह साजरा केला.नांझा येथील गुणवंत मारोती दाभेकर यांचा विवाह गावातीलच सुषमा रामचंद्र देवनळे हिच्याशी जुळला. तत्पूर्वी या दोन्ही युवक-युवतींनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले होते. लग्नाच्या दिवशीही त्यांनी श्रमदान करुनच आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली.आंधबोरी येथील भारती भोयर हिचा विवाह नांदुरा येथील प्रशांत पोटकुले याचेशी जुळला. गावाला पाणीदार करण्यासाठी अख्ख आंधबोरी मग्न आहे. भोयर कुटुंबही खारीचा वाटा उचलत आहे. सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकदिलाने एकत्र आले आहे. सर्वजण मनापासून श्रमदानात गुंतले आहे. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ हा जलसंधारणाचा मूलमंत्र घेऊन गावाने सकारात्मक आणि आशावादी वाटचाल सुरु केली आहे. गावातील आबालवृध्द मोठ्या उत्साहाने श्रमदानात आपला वाटा उचलत आहे. नवदाम्पत्यानेही या गावात श्रमदान केले.लग्नाच्या दिवशीही श्रमदान करुन कुठलेही तत्वज्ञान न सांगता समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात श्रमदानाने व्हावी यासाठी या जोडप्यांनी आधी श्रमदान नंतर सप्तपदी केली. हा त्यांचा सर्व खटाटोप गावाला पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी होता.