शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अखेर ‘त्या’ ४२ शाळा वाचल्या! २५ एप्रिलचा प्रस्ताव स्थगित करण्याची शासनाला विनंती, संचालकांचे घूमजाव

By अविनाश साबापुरे | Updated: June 9, 2024 08:01 IST

Yavatmal News: राज्यातील मुलींच्या ४२ शाळा बंद करून तेथे केवळ वसतिगृहे सुरू ठेवावे, असा अजब प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शासनाला दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली.

- अविनाश साबापुरेयवतमाळ - राज्यातील मुलींच्या ४२ शाळा बंद करून तेथे केवळ वसतिगृहे सुरू ठेवावे, असा अजब प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शासनाला दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. परिषदेच्या संचालकांनी तातडीने घूमजाव करीत आपला प्रस्ताव स्थगित ठेवावा, अशी लेखी विनंती शासनाकडे केली. त्यामुळे सध्या तरी या शाळा सुरूच राहणार आहेत.

वंचित घटकातील मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने महाराष्ट्रात २००८ पासून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू केली. मात्र, आता नव्या शिक्षण धोरणानुसार या शाळांमध्ये ‘सहशिक्षणा’च्या तत्त्वाचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव करण्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक प्रदीप डांगे यांनी  पाठविला होता. 

२०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून ४२ शाळा बंद करून तेथे केवळ वसतिगृह सुरू ठेवण्याची विनंती त्यांनी केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३ जूनच्या अंकात ‘मुलींच्या ४२ शाळा करा बंद, शिक्षण परिषदेचा अजब अहवाल’ अशा मथळ्याचे वृत्त दिले होते.त्यामुळे जनमानस संतप्त झाले. मावळा संघटनेने शिक्षण परिषदेकडे जाब विचारला. मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांनीही चिंता व्यक्त केली. याची दखल परिषदेने घेतली. 

पालकांना हे विद्यालय आपल्या मुलींच्या शिक्षणाचे माहेरघर वाटते. त्यामुळे ही विद्यालये बंद करण्याचा २५ एप्रिलचा प्रकल्प संचालकांचा प्रस्ताव रद्द करून याबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा व्हावी. संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतले जावे. या विद्यालयांच्या दोन एकरांतील इमारतींवर कुणाचा तरी डोळा असावा असे वाटते.- राहुलदेव मनवर, उपाध्यक्ष, मावळा संघटना 

थांबलेली प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार?  - परिषदेच्या संचालकांनी ६ जूनला शिक्षण सचिवांना पत्र पाठवून आपला २५ एप्रिलचा प्रस्ताव स्थगित करण्याची विनंती केली.- तसेच उच्च न्यायालयाच्या १२ जुलै २०१७ रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाबाबत सध्याच शासन स्तरावरून कोणताही निर्णय घेणे उचित होणार नाही, असेही संचालकांनी आपल्या पत्रात नमूद केले. - त्यामुळे ४२ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये पूर्वीप्रमाणेच अध्यापन व निवास अशा दोन्ही स्वरुपात सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच २०२४-२५ या सत्राची थांबलेली प्रवेश प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणYavatmalयवतमाळ