अखेर विद्यार्थ्यांना मिळाले भोजन
By Admin | Updated: September 18, 2014 23:41 IST2014-09-18T23:41:13+5:302014-09-18T23:41:13+5:30
मेसचे कंत्राट संपल्याने गेल्या चार दिवसांपासून उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच समाज कल्याण विभागाने कंत्राट देऊन विद्यार्थ्यांच्या भोजनाची

अखेर विद्यार्थ्यांना मिळाले भोजन
राळेगाव : मेसचे कंत्राट संपल्याने गेल्या चार दिवसांपासून उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच समाज कल्याण विभागाने कंत्राट देऊन विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.
राळेगाव येथील समाज कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाचे कंत्राट १५ आॅगस्ट रोजी संपले होते. मात्र मानवतेच्या दृष्टीकोणातून कंत्राटदाराने काही दिवस त्यांना भोजन दिले. मात्र १३ सप्टेंबरपासून मेस बंद केली. परिणामी येथील २८ विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली. वसतिगृह अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभागाने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. दरम्यान ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले, आणि समाज कल्याण विभाग खडबडून जागा झाला. पूर्वीच्याच कंत्राटदाराला कंत्राट देऊन गुरुवारपासून या विद्यार्थ्यांची मेस सुरू केली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना अधीक्षकाने दूरध्वनी करून बोलावून घेतले. (प्रतिनिधी)