शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कचरा स्वच्छतेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न लावून धरला होता. शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी कचरा प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकला. याची गंभीर दखल घेत   जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील कचरा हटविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. नगरपरिषद प्रशासनाकडून  कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ठिकठिकाणी कचरा साचला आहे. यातून जलजन्य व बुरशीजन्य आजार पसरण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देयवतमाळ पालिका लागली कामाला : २० ट्रॅक्टर, २५० कर्मचारी जुंपले, कचरा उचलला, पण डम्पिंग यार्डमध्ये वाहन शिरेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील कचरा प्रश्नाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सफाई कंत्राटदाराला तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शनिवारपासून कामाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी २० ट्रॅक्टर, दोन जेसीबी, दोन टिपर, २५०   कामगारांद्वारे कचरा टाकण्याचे काम सुरू झाले.  ‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न लावून धरला होता. शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी कचरा प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकला. याची गंभीर दखल घेत   जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील कचरा हटविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. नगरपरिषद प्रशासनाकडून  कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.ठिकठिकाणी कचरा साचला आहे. यातून जलजन्य व बुरशीजन्य आजार पसरण्याचा धोका आहे. तो  लक्षात घेत नगरसेवकांनी निषेध नोंदविला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला शुक्रवारी काम सुरू करण्याचे आदेश दिले. प्रत्येक प्रभागात सफाईसाठी कर्मचारी पोहोचले. त्यांनी प्रथम मोठ्या रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम हाती घेतले. यासोबतच सुस्थितीत असलेल्या घंटागाड्या आणि ॲपेची मदत घेण्यात आली. काही वाहने नादुरुस्त आहेत. ती तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी नगर परिषदेकडे केली आहे. तत्पूर्वी शहरातील कचरा हटविण्यासाठी अमरावतीवरून १५ ट्रॅक्टर कंत्राटदार आणणार आहेत. डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकण्यासाठी जाताच येत नाही. कचरा घेऊन जाणारी वाहन या ग्राउंडच्या बाहेर थांबली होती. 

जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता- शहरातील अस्वच्छतेची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. शुक्रवारीच तब्बल दहा कोटींच्या कामांना मंजुरी मिळविण्यासाठी त्यांनी तत्परता दाखविली. दहा कोटींची कामे मंजूर करण्याचे अधिकार अमरावती येथील जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांना आहे. मात्र शहराची समस्या जाणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपले अमरावतीमधील स्त्रोत वापरुन एकाच दिवशी दहा कोटींची कामे मंजूर करवून घेतली. लगेच प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेशही दिले. यासाठी त्यांनी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाच्या वैयक्तिक संबंधांचा वापर केला. 

निविदा प्रक्रिया, ठराव आणि वर्क ऑर्डर झाली आहे. शहरातील स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण प्रक्रिया सुस्थितीत आणण्यासाठी पाच ते सात दिवस लागतील. त्यानंतर स्वच्छता नियमित प्रक्रियेत येईल. कुठेही हयगय न करता शहरात स्वछता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.- अमोल येडगे, जिल्हाधिकारी

टॅग्स :dumpingकचराcollectorजिल्हाधिकारी