शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्याय हक्कासाठी संस्था, संघटनांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:10 IST

विविध प्रश्नांना घेऊन शुक्रवारी संघटना, संस्थांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. कुंभार समाज, भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) संघटना आदींनी विविध विषय प्रशासनाकडे मांडले.

ठळक मुद्देकुंभार समाजाला हवे स्वतंत्र बोर्ड : भूविकास बँकेच्या सेवानिवृत्तांचा बैठा सत्याग्रह, ‘नफ’ची जिल्हा कचेरीवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध प्रश्नांना घेऊन शुक्रवारी संघटना, संस्थांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. कुंभार समाज, भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) संघटना आदींनी विविध विषय प्रशासनाकडे मांडले.कुंभार समाज महासंघकुंभार समाज महासंघाने आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडल्या. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा आदी राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्वतंत्र मातीकला बोर्ड स्थापन करावे, उदरनिर्वाहासाठी भटकंतीचे जीवन जगणाºया या समाजाचा भटक्या विमुक्त जमाती (एनटी) या प्रवर्गात समावेश करावा, वीट, व्यवसायासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, संत शिरोमणी गोरोबाकाका यांचे जन्मगाव तेर (जि.उस्मानाबाद) या गावाचा सर्वांगीण विकास करावा, तेर तीर्थक्षेत्रास अ दर्जा देण्यात यावा, मातीवरील रॉयल्टी माफी व समाजातील वीट व्यावसायिकांना आवश्यक परवान्याबाबतचे स्पष्ट निर्देश संबंधित प्रशासनाला देण्यात यावे, समाजातील ५० वर्षांवरील कारागिरांना मासिक तीन हजार रुपये मानधन द्यावे, एमआयडीसी क्षेत्रात कुंभार व्यावसायिकांना अग्रक्रमाने जागा देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहे.निवेदन देताना महाराष्ट्र कुंभार महासंघ महिला आघाडीच्या सरचिटणीस अंजू चिलोरकर, विदर्भ युवा अध्यक्ष विक्की जिल्लडवार, युवा संघटक अमोल मोहबिया, युवा जिल्हाध्यक्ष गंगाधर खंडारे, माधवराव मेहर, दिलीप राजुरकर, संजय तायडे, सुखलाल प्रजापती, राकेश प्रजापती, अशोक अंबाधरे, सुरज पात्रे आदी उपस्थित होते.सेवानिवृत्तांचा बैठा सत्याग्रहभूविकास बँकेच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह केला. या बँकेतील सेवानिवृत्तांनी सेवाग्राम येथे सुरू केलेल्या सत्याग्रहाचा ३४ वा दिवस उजाडला. यानंतरही राज्य शासनाने प्रश्न मार्गी लावला नाही. या सत्याग्रहाच्या समर्थनार्थ येथे सत्याग्रह करण्यात आला.२००७-२००८ पासून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची देय ग्रॅच्यूईटी, रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त निर्देशांक, महागाई भत्ता त्वरित मिळावा, २०१० पासून स्वेच्छा सेवानिवृत्ती, नियमित सेवानिवृत्ती, ३ आॅगस्ट २०१७ च्या शासन निर्णयानुसार कार्यमुक्त करण्यात आलेल्या सेवानिवृत्तांची ग्रॅच्यूईटी, रजेचे वेतन, नियमित वेतन, स्वेच्छानिवृत्तीची नुकसान भरपाई मिळावी, २००१ ते २००९ या कालावधीत सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांचा प्रलंबित देय अतिरिक्त निर्देशांक महागाईभत्ता त्वरित अदा व्हावा आदी मागण्यांसाठी सत्याग्रह करण्यात आला.या सत्याग्रहात ए.ए. बाहे, पी.व्ही. देशमुख, पी.टी. चव्हाण, एस.डी. चौधरी, मनिष येंडे, पी.यू. महल्ले, टी.एन. सळमाखे, यू.एल. पाटील, गजानन पाटील आदी सहभागी झाले होते.‘नफ’ची कचेरीवर धडकराष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ)च्यावतीने विविध प्रश्नांना घेऊन धरणे देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून मागण्यांचे निवेदन सादर केले.अहमदनगर जिल्ह्याच्या खर्डा येथील नितीन आगे या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला महाविद्यालयातून बाहेर काढून जीवघेणी मारहाण करण्यात आली. त्याला जंगलात नेऊन मृतदेह झाडाला लटकविण्यात आला. या हत्याकांड प्रकरणाचा खटला उच्च व सर्वोच्च न्यायालयात चालविण्यासाठी विशेष तपास अधिकारी नियुक्त करून पुरावे गोळा करावे, खटल्याचा निकाल लागेपर्यंत पीडित कुटुंब व साक्षीदारांना विशेष पोलीस संरक्षण द्यावे, या कुटुंबाला आर्थिक सहाय्य द्यावे, महाराष्ट्रभर झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेसमध्ये विशेष यंत्रणा निर्माण करून पीडितांना जलद गतीने न्याय द्यावा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा लाभ भटक्या विमुक्त जमातींना मिळावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.निवेदन देताना माजी सरपंच माया किशोर गजभिये, संदीप मून, विनोद डवले, सुरेंद्र परडखे, विलास गायकवाड, भाग्यश्री तिरमारे, कुणाल वासनिक, प्रभाकर सावळे, हिम्मत भगत आदींची उपस्थिती होती.पळसवाडीतील अतिक्रमणग्रस्तांच्या उपोषणाचा ११ वा दिवस उजाडलायवतमाळ : येथील पळसवाडी कॅम्प परिसरातील १२ कुटुंबांची घरे पाडण्यात आली. उघड्यावर आलेल्या या कुटुंबांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा शुक्रवारी ११ वा दिवस उजाडला आहे. घरातील चिल्यापिल्यांसह हे कुटुंब उपोषणाला बसले आहे. मंडपातच स्वयंपाक करून तेथे लेकरांना जेवण घातले जात आहे. यानंतरही प्रशासनाकडून त्यांची व्यथा समजून घेतली जात नाही. पर्यायी जागेसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे. जनहित माझे गाव संघटनेचे विलास झेंडे, शंकर भोंगे, पारस अराठे, नीलेश ठाकूर आदींनी या उपोषणकर्त्यांचे प्रश्न उपोषण मंडपाला भेट देऊन जाणून घेतले. हक्काची जागा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, अशी भूमिका घेतली असल्याचे गणेश भांडवले, राजू गवळी, सुरज लोंढे, वैभव वासनिक, संजय वानखडे यांनी सांगितले.