शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला! दोन वर्षांपासून उष्माघाताच्या बळींची संख्या शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 20:16 IST

Yawatmal news दरवर्षी उन्हाळा आल्यानंतर आरोग्य विभागाला प्रारंभी उष्माघात कक्षाची निर्मिती करावी लागते. मात्र, गत दोन वर्षांमध्ये आरोग्य विभागाला असा कक्ष उघडण्याची आवश्यकताच पडली नाही. या काळात उष्माघाताचे बळी गेले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : दरवर्षी उन्हाळा आल्यानंतर आरोग्य विभागाला प्रारंभी उष्माघात कक्षाची निर्मिती करावी लागते. मात्र, गत दोन वर्षांमध्ये आरोग्य विभागाला असा कक्ष उघडण्याची आवश्यकताच पडली नाही. या काळात उष्माघाताचे बळी गेले नाहीत.

२०१८ मध्ये जिल्ह्यात उष्माघाताचे ४९ बळी होते. २०१९ मध्ये ही संख्या ५२ वर गेली. २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये उष्माघाताच्या बळींची संख्या निरंक झाली आहे.

कोरोनाचा प्रकोप थांबविण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. याच काळात ऊनही तापले. लाॅकडाऊनमुळे सर्व नागरिक घरातच होते. परिणामी उष्माघातासारख्या भीषण प्रकोपापासून नागरिकांचा बचाव झाला. २०२१ मध्ये मार्च महिन्यापासूनच ऊन ४० अंश सेल्सिअसपासून ४३ अंशांपर्यंत पोहोचले. उन्हाचा हा चटका सर्वसामान्य नागरिकाला सहन होणारा नाही. अशा स्थितीत विसाव्याने नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून स्वत:चा बचाव करता आला. यामुळे इतरांचे प्राण वाचले आहेत, तर आरोग्य व्यवस्थेवरील वाढलेला ताण रुग्ण नसल्याने आपसूकच कमी झाला आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य यंत्रणेला कोविडच्या क्षेत्रात काम करता आले.

ऊन वाढले तरी...

उन्हाचा पारा सतत वर चढत आहे. यवतमाळचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. उष्णतेची लाट कायम असतानाही उष्माघाताने कुणाचा बळी गेला, अशी कुठलीही नोंद गेल्या दोन वर्षात जिल्ह्यामध्ये झाली नाही. कोविडमुळे लाॅकडाऊन असल्याने सर्व जण घरातच वास्तव्याला आहेत. यातून उष्माघाताचा प्रकोप झाला नाही.

उन्हाळा घरातच !

जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. याचा परिणाम पिकांवर झाला. पिकाचे उत्पादन घटले. मात्र, याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले. नंतरच्या काळात लाॅकडाऊन जाहीर झाले. ठरावीक वेळ त्यासाठी देण्यात आला. यामुळे मर्यादित काळासाठी बाहेर आणि नंतर दिवसभर घरातच असे संपूर्ण चित्र पाहायला मिळाले. याचा परिणाम इतर आजार न होण्यावर झाला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताचा प्रकोप थांबविण्यासाठी कक्ष उघडला जातो.

आरोग्य यंत्रणा प्रत्येक आजारासाठी सज्ज आहे. दरवर्षी उष्माघाताचा प्रकोप होतो. यामुळे अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येते. कोरोनामुळे उष्माघाताचे बळी थांबले. या काळात नागरिक सुरक्षितता म्हणून घरातच होते. यातून उन्हापासून नागरिकांचा बचाव झाला आहे.

- डाॅ. हरी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Sun strokeउष्माघात