शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीमुळे अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:19 IST

शहरातून जाणाºया दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या मोठमोठ्या झाडांची लाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. या लाकडांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देदिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्ग : कंत्राटदाराचे दुर्लक्ष, रात्र ठरते वैऱ्याची

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरातून जाणाºया दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या मोठमोठ्या झाडांची लाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. या लाकडांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे एका बांधकाम कंपनीमार्फत या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याकरिता शहरातील वृक्ष तोड करण्यात आली. मात्र तोडलेली लाकडे उचलण्याकडे बांधकाम कपंनीचे दुर्लक्ष होत आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नाही. दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा महामार्ग दारव्हा शहरातून जातो. त्यामुळे बसस्थानक ते दिग्रस बायपास या मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची मोठमोठी वृक्षे तोडण्यात आली आहे.वृक्ष तोडीनंतर मोठ्या प्रमाणात लाकडे रस्त्यालगत पडून आहे. या मार्गावरून दारव्हा ते यवतमाळ, अशी वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. याच मार्गावर जिल्हा व सत्र न्यायालय, पाटबंधारे विभाग, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, विश्रामगृह, मुंगसाजी महाराज महाविद्यालय, गजानन महाराज मंदिर अशी शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था व मंगल कार्यालये आहे. त्यामुळे या मार्गाने दररोज नागरिक, वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र याच महत्त्वाच्या मार्गावर ही लाकडे अनेक दिवसांपासून पडून असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रात्री अनेक वाहनधारकांना रस्त्यालगतची ही लाकडे दिसत नाही. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. यातूनच एखादवेळी मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या बेजबाबदारपणाबद्दल कंत्राटदारावर कारवाई व्हावी व रस्त्यालगतची लाकडे तत्काळ हटवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.वृक्षतोडीमुळे रस्ता झाला भकासमहामार्गाच्या रूंदीकरणासाठी बसस्थानक ते मुंगसाजी महाराज महाविद्यालयपर्यंतचे वृक्ष तोडण्यात आले. त्यामुळे मार्गावरील वातावरण भकास बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वीची कडूलिंबाची मोठ्या प्रमाणातील वृक्षे वाटसरूंना सावली देत होते. या भागातील वातावरण या वृक्षांमुळे सुंदर वाटत होते. परंतु वृक्ष तोडीमुळे या मार्गाचे स्वरूपच बदलले आहे. अतिशय वयस्क असलेली ही वृक्षे तोडली गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रुंदीकरणासाठी वृक्ष हटविणे आवश्यक असले, तरी ते तोडण्याऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करायला हवा होता, असे बोलले जात आहे.

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग