शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

शेतकऱ्याचा भाजीपाला मातीमोल, विक्रेत्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:39 IST

दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा फटका : गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले, स्वयंपाकघरात भाज्यांचा ओघ झाला कमी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे.सर्व भाजीपाल्याचे दर किलोमागे जवळपास १00 रुपयांच्या आसपास झाले आहे. परिणामी आहारातून हिरव्या भाज्यांची संख्या कमी झाली. त्याऐवजी डाळींचा वापर वाढला आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यातील सर्वच नदी-नाले कोरडे पडले. विहीर व विंधन विहिरीची पाणी पातळी खोल गेली. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली. माळरानही ओस पडले. पाणीटंचाईमुळे विकतचे पाणी घेऊन दिवस काढणाºया नागरिकांवर आता भाजीपाला महागल्याचा भार पडला.पाणी नसल्यामुमळे भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपालाच नाही. ज्यांनी लागवड केली, त्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. दुसरीके हाच भाजीपाला विक्रेते चढ्या दराने विकत आहे. परिणामी प्रत्येक भाजीपाल्याचे किलोमागे दर वधारले. महिलांना गल्लीत येणाऱ्या हातगाडीवर भाजीपाला खरेदी करणे अवघड झाले. हातगाडीवर आधीच आठवडी बाजारापेक्षा जादा दर असतात. आता हे दरही चांगलेच वधारले आहे. बाजारातून भाजीपाला आणायचा म्हटल की ग्राहकांच्या अंगावर काटा येत आहे. यात मोठे कुटुंब असेल तर पाचशे रुपयांची नोट क्षणार्धात खरेदीत जात आहे.कमी पावसाचा बसला फटकागेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. यावर्षी पाणीटंचाईमुळे अनेकांनी भाजीपाल्याची लागवडच केली नाही. गेल्यावर्षीचा कमी पाऊस आणि यंदाची पाणीटंचाई यामुळे भाजीपाल्याचे दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या