शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्याचा भाजीपाला मातीमोल, विक्रेत्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:39 IST

दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा फटका : गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले, स्वयंपाकघरात भाज्यांचा ओघ झाला कमी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे.सर्व भाजीपाल्याचे दर किलोमागे जवळपास १00 रुपयांच्या आसपास झाले आहे. परिणामी आहारातून हिरव्या भाज्यांची संख्या कमी झाली. त्याऐवजी डाळींचा वापर वाढला आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यातील सर्वच नदी-नाले कोरडे पडले. विहीर व विंधन विहिरीची पाणी पातळी खोल गेली. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली. माळरानही ओस पडले. पाणीटंचाईमुळे विकतचे पाणी घेऊन दिवस काढणाºया नागरिकांवर आता भाजीपाला महागल्याचा भार पडला.पाणी नसल्यामुमळे भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपालाच नाही. ज्यांनी लागवड केली, त्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. दुसरीके हाच भाजीपाला विक्रेते चढ्या दराने विकत आहे. परिणामी प्रत्येक भाजीपाल्याचे किलोमागे दर वधारले. महिलांना गल्लीत येणाऱ्या हातगाडीवर भाजीपाला खरेदी करणे अवघड झाले. हातगाडीवर आधीच आठवडी बाजारापेक्षा जादा दर असतात. आता हे दरही चांगलेच वधारले आहे. बाजारातून भाजीपाला आणायचा म्हटल की ग्राहकांच्या अंगावर काटा येत आहे. यात मोठे कुटुंब असेल तर पाचशे रुपयांची नोट क्षणार्धात खरेदीत जात आहे.कमी पावसाचा बसला फटकागेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. यावर्षी पाणीटंचाईमुळे अनेकांनी भाजीपाल्याची लागवडच केली नाही. गेल्यावर्षीचा कमी पाऊस आणि यंदाची पाणीटंचाई यामुळे भाजीपाल्याचे दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या