शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

शेतकऱ्याचा भाजीपाला मातीमोल, विक्रेत्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:39 IST

दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा फटका : गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले, स्वयंपाकघरात भाज्यांचा ओघ झाला कमी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे.सर्व भाजीपाल्याचे दर किलोमागे जवळपास १00 रुपयांच्या आसपास झाले आहे. परिणामी आहारातून हिरव्या भाज्यांची संख्या कमी झाली. त्याऐवजी डाळींचा वापर वाढला आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यातील सर्वच नदी-नाले कोरडे पडले. विहीर व विंधन विहिरीची पाणी पातळी खोल गेली. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली. माळरानही ओस पडले. पाणीटंचाईमुळे विकतचे पाणी घेऊन दिवस काढणाºया नागरिकांवर आता भाजीपाला महागल्याचा भार पडला.पाणी नसल्यामुमळे भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपालाच नाही. ज्यांनी लागवड केली, त्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. दुसरीके हाच भाजीपाला विक्रेते चढ्या दराने विकत आहे. परिणामी प्रत्येक भाजीपाल्याचे किलोमागे दर वधारले. महिलांना गल्लीत येणाऱ्या हातगाडीवर भाजीपाला खरेदी करणे अवघड झाले. हातगाडीवर आधीच आठवडी बाजारापेक्षा जादा दर असतात. आता हे दरही चांगलेच वधारले आहे. बाजारातून भाजीपाला आणायचा म्हटल की ग्राहकांच्या अंगावर काटा येत आहे. यात मोठे कुटुंब असेल तर पाचशे रुपयांची नोट क्षणार्धात खरेदीत जात आहे.कमी पावसाचा बसला फटकागेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. यावर्षी पाणीटंचाईमुळे अनेकांनी भाजीपाल्याची लागवडच केली नाही. गेल्यावर्षीचा कमी पाऊस आणि यंदाची पाणीटंचाई यामुळे भाजीपाल्याचे दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या