शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या साठमारीत शेतकरी हवालदिल: उद्धव ठाकरे, भाजपच्या निष्ठावंतात खदखद

By सुरेंद्र राऊत | Updated: July 9, 2023 15:18 IST

दुर्देवाने आताचे राजकारणी पक्ष पळविण्यातच व्यस्त आहेत. 

सुरेंद्र राऊत, यवतमाळ : राज्यातील सत्तेची साठमारी सुरू आहे. यात कुणाला सोबत घ्यायचे, जवळ बसवायचे असे प्रयोग सुरू आहे. दुसरीकडे मात्र येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्यावर पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यातच बोगस बियाण, खत याही समस्या उभ्या ठाकल्या आहे. एकूणच ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर त्यांच्याच पक्षातील निष्ठावंत नाराज होत आहेत, असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी यवतमाळात झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले. 

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेवून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकारणाची सुरुवात केली. आता ही मंडळी सत्तेत आल्यानंतरही त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील समस्याची जाण असल्याचे सांगत आज येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील शेतकऱ्यांच्या पिकाला हमखास भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी विकेल ते पिकेल अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. दुर्देवाने आताचे राजकारणी पक्ष पळविण्यातच व्यस्त आहेत. 

भाजपसोबतच्या युतीत २०१९ मध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्याचा फाॅर्म्युला ठारला होता. तो त्यांनी पाळला नाही. यामुळे आता भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्ते व निष्ठावंतांवरच सतरंज्या उचलायची वेळ आली आहे. ही खदखद यातील काहींनी खासगीत आपल्याकडे बोलून दाखविल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. ज्या भुजबळांवर टिका केली जात होती त्यांनाच आज सत्तेत घेतले आहे. राज्यातील हा प्रकार कार्यकर्ता व सामान्य जनतेला रुचलेला नाही. त्यामुळे आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. स्वत:हून लोक भेटायला येत आहे. ज्याप्रमाणात आऊट गोईंग आहे त्यापेक्षा दुपटीने इनकमींग सुरू आहे. आमच्या शेतातील एक पीक त्यांनी कापून नेलं. मात्र आता आम्ही नव्याने लागवड करून चांगल पीक घेणार आहो. त्याला जनतेच सहकार्यही मिळत आहे. शिवसैनिकांना संधी दिली जात आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

दाैऱ्याची सुरुवात राज्यात कुठूनही केली असती तरी प्रश्न इथूनच का असा विचारला गेला असता. महाविकास आघाडीच्या सभा घेताना यवतमाळ जिल्हा सुटला. शिवाय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यामुळे दाैऱ्याची सुरुवात या पवित्र स्थळापासून केली. या दाैऱ्यात जाहीर सभा होणार नाही. सध्या शेतीच्या कामाचे दिवस आहे. माझा शिवसैनिकही शेतकरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकून घ्यायच्या आहे. पुढची रणनिती ठरवायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. असा निर्णय घेतला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, लक्ष्मण वडले आदी उपस्थित होते. पत्रपरिषदेनंतर उद्धव ठाकरे पोहरादेवीकडे रवाना झाले. दिग्रस येथे कार्यकर्त्याच्या भेटीनंतर ते अमरावती मुक्कामी जाणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे