शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

सत्तेच्या साठमारीत शेतकरी हवालदिल: उद्धव ठाकरे, भाजपच्या निष्ठावंतात खदखद

By सुरेंद्र राऊत | Updated: July 9, 2023 15:18 IST

दुर्देवाने आताचे राजकारणी पक्ष पळविण्यातच व्यस्त आहेत. 

सुरेंद्र राऊत, यवतमाळ : राज्यातील सत्तेची साठमारी सुरू आहे. यात कुणाला सोबत घ्यायचे, जवळ बसवायचे असे प्रयोग सुरू आहे. दुसरीकडे मात्र येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्यावर पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यातच बोगस बियाण, खत याही समस्या उभ्या ठाकल्या आहे. एकूणच ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर त्यांच्याच पक्षातील निष्ठावंत नाराज होत आहेत, असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी यवतमाळात झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले. 

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेवून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकारणाची सुरुवात केली. आता ही मंडळी सत्तेत आल्यानंतरही त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील समस्याची जाण असल्याचे सांगत आज येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील शेतकऱ्यांच्या पिकाला हमखास भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी विकेल ते पिकेल अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. दुर्देवाने आताचे राजकारणी पक्ष पळविण्यातच व्यस्त आहेत. 

भाजपसोबतच्या युतीत २०१९ मध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्याचा फाॅर्म्युला ठारला होता. तो त्यांनी पाळला नाही. यामुळे आता भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्ते व निष्ठावंतांवरच सतरंज्या उचलायची वेळ आली आहे. ही खदखद यातील काहींनी खासगीत आपल्याकडे बोलून दाखविल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. ज्या भुजबळांवर टिका केली जात होती त्यांनाच आज सत्तेत घेतले आहे. राज्यातील हा प्रकार कार्यकर्ता व सामान्य जनतेला रुचलेला नाही. त्यामुळे आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. स्वत:हून लोक भेटायला येत आहे. ज्याप्रमाणात आऊट गोईंग आहे त्यापेक्षा दुपटीने इनकमींग सुरू आहे. आमच्या शेतातील एक पीक त्यांनी कापून नेलं. मात्र आता आम्ही नव्याने लागवड करून चांगल पीक घेणार आहो. त्याला जनतेच सहकार्यही मिळत आहे. शिवसैनिकांना संधी दिली जात आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

दाैऱ्याची सुरुवात राज्यात कुठूनही केली असती तरी प्रश्न इथूनच का असा विचारला गेला असता. महाविकास आघाडीच्या सभा घेताना यवतमाळ जिल्हा सुटला. शिवाय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यामुळे दाैऱ्याची सुरुवात या पवित्र स्थळापासून केली. या दाैऱ्यात जाहीर सभा होणार नाही. सध्या शेतीच्या कामाचे दिवस आहे. माझा शिवसैनिकही शेतकरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकून घ्यायच्या आहे. पुढची रणनिती ठरवायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. असा निर्णय घेतला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, लक्ष्मण वडले आदी उपस्थित होते. पत्रपरिषदेनंतर उद्धव ठाकरे पोहरादेवीकडे रवाना झाले. दिग्रस येथे कार्यकर्त्याच्या भेटीनंतर ते अमरावती मुक्कामी जाणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे