शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

शेतकऱ्यांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:26 PM

पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.

ठळक मुद्देप्रशिक्षण : कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन, दिग्रसमध्ये समूह शेती प्रयोग

ऑनलाईन लोकमतदिग्रस : पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.येथील जिजामाता सभागृहात शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यावेळी बोलताना जाधव म्हणाले, कृषी विभागातर्फे शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, कृषिमाल प्रक्रिया, पणन आदींवर लक्ष दिले जात आहे. त्याअनुषंगाने राबविण्यात येणाºया योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक डी.बी. काळे, जिल्हा रेशीम प्रकल्प अधिकारी बावगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर हिवरे, डॉ. प्रशांत राऊत, कृषीभूषण गणेश मात्रे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी होत असल्याने आधुनिक पद्धतीने काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकरी गटांना कृषिपूरक व्यवसायाकरिता सामूहिकरित्या दालमिल, अवजारे बँक, सेंद्रिय शेती, ग्राम बिजोत्पादन, कृषी निविष्टा विक्री केंद्र, प्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण व अभ्यास दौरे, प्रात्याक्षीक आदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गट शेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी गटांनी आता शेतकररी उत्पादक कंपनीकडे वाटचाल करावी, असे आत्माचे डी.बी. काळे यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे कृषी संवादिनीचे वाटप करण्यात आले. गुुलाबी बोंडअळी नियंत्रण व्यवस्थापन व उपाययोजना, उन्हाळी भूईमूग, तीळ पीक व्यवस्थापन, पेरणी ते काढणीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले. रामभाऊ मोर्शटवार, रवींद्र राऊत, रामेश्वर पवार, अमृत महिंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार सागर बोंडे यांनी मानले.