शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बाजार समितीत शेतकऱ्यांचा रुद्रावतार

By admin | Updated: April 24, 2017 00:01 IST

तूर खरेदीच्या अखेरच्या दिवशी नाफेडकडून व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला.

नाफेडची तूर खरेदी : कार्यालयात तोडफोड, खुर्च्यांची फेकाफेक, हमाल व मापाऱ्यांकडून मोजणी बंद यवतमाळ : तूर खरेदीच्या अखेरच्या दिवशी नाफेडकडून व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत रुद्रावतार धारण करीत कार्यालयात तोडफोड केली. खुर्च्यांची फेकाफेक केली. या प्रकाराने प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने हमाल आणि व्यापाऱ्यांनी तुरीचे मोजमापच बंद केले. परिणामी शेकडो शेतकऱ्यांना रात्रभर बाजार समितीच्या आवारातच थांबावे लागले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी केली जात होती. परंतु सुरुवातीपासूनच या तूर खरेदीबाबत गोंधळाची स्थिती होती. २२ एप्रिलपासून खरेदी बंदचे आदेश धडकले. त्यामुळे टोकनधारक शेतकरी दोन दिवसांपासूनच येथे ठाण मांडून होते. शनिवारी पोलीस संरक्षणात खरेदी करावी लागली. तरीही संपूर्ण तूर खरेदी होऊ शकली नाही. शनिवारी सायंकाळी बाजार समितीत काही व्यापाऱ्यांच्याच तुरी खरेदी केल्या जात होत्या. परंतु गत काही दिवसांपासून मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना डावलले जात होते. ६०० ते ७०० टोकन नंबर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुरी मोजल्या जात नव्हत्या. १२००, १५००, १७०० टोकन क्रमांक असलेल्यांच्या तुरींची मोजणी होत होती. नाफेडचे कोणतेही नियोजन नसल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यातच दुपारपासून बारदान्याचा तुटवडा होता. रात्री १६ गाठी बारदाना पोहोचला. मात्र यातील बहुतांश बारदाना व्यापाऱ्यांच्या मजुरांनी पळवून नेला. त्यामुळे वातावरण आणखीणच तापले. रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास काही शेतकऱ्यांनी बाजार समिती सभापतीच्या कक्षाकडे धाव घेतली. तेथेही कुणीच नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काट्याची तोडफोड करीत संताप व्यक्त केला. त्यानंतर शेतकरी व्यापाऱ्यांच्या तुरी मोजणी सुरू असलेल्या ठिकाणाकडे वळले. हा गोंधळ पाहून हमाल व मापारीही चांगलेच संतापले. त्यांनी शेतकऱ्याच्या मालाला व्यापाऱ्यांचा माल म्हणून फेकाफेक का करता असे म्हणत तेथे उपस्थित संचालक व व्यापाऱ्याला जाब विचारला. संचालकाला धक्काबुक्की झाली तर उपस्थित व्यापाऱ्याला चांगलाच चोप देण्यात आला. या प्रकारामुळे हमाल व मापाऱ्यांनी तुरीचे मोजमाप थांबविले. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात सभापती रवींद्र ढोक यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. (शहर वार्ताहर) नाफेडचा छापाच पळविलाकेंद्रावर आलेल्या बारदान्यावर नाफेडचा छापा मारणे महत्वाचे असते. रात्री येथे आलेल्या बारदान्यावर छापे मारले जात होते. या ठिकाणी दोन छापे होते. मात्र रात्री यातील एक छापा अचानक पळविला गेला. त्यामुळे ध्वनीक्षेपकावरून उद्घोषणा करण्यात आली. काही वेळानंतर हा छापा केंद्रात परत आला. लिलावगृहात पोते पोहोचले कसे ?लिलावगृह केवळ शेतमालाच्या लिलावासाठी आहे. खुल्या मैदानात नाफेडच्या तुरी आहे. शनिवारी रात्री लिलाव गृहाच्या मोठ्या शेडमध्ये तुरीचे मोजमाप करण्यात आले. हा शेतमाल व्यापाऱ्यांचाच असावा, असा संशय शेतकऱ्यांना आला. त्यामुळे त्यांनी मोजमाप थांबविण्याची मागणी केली. यानंतरही तुरीचा काटा करण्यात आला. या प्रकाराचाही शेतकऱ्यांनी संताप नोंदविला. २१ हजार शेतकरी टोकनधारक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकण्यासाठी बाजार समितीतून टोकन घेतले. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या २१ हजार आहे. या शेतकऱ्यांची पावणेचार लाख क्ंिवटल तूर अजूनही मोजण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यात यवतमाळ येथे ७ हजार ५०० क्ंिवटल, दिग्रस दहा हजार क्ंिवटल, उमरखेड दीड हजार क्ंिवटल, बाभूळगाव १२०० क्ंिवटल, पुसद १६ हजार ५७५ क्ंिवटल, कळंब २२०० क्ंिवटल, आर्णी दीडशे क्ंिवटल, पांढरकवडा पाच हजार क्ंिवटल, दारव्हा ११ हजार क्ंिवटल, मुकुटबन दीड हजार क्ंिवटल, मारेगाव ३५०० क्ंिवटल तुरीचा समावेश आहे.तूर खरेदीसाठी आजपासून घुगरी आंदोलनशेतकऱ्यांच्या तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्यात २१ हजार ३०० टोकनधारक शेतकऱ्यांची तीन लाख ७५ हजार क्ंिवटल तूर खरेदीच केली नाही. उलट नाफेडने २२ एप्रिलपासून खरेदी बंद केली. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने सोमवारपासून घुगरी आंदोलन (तूर शिजवून वाटप करणे) करण्याची घोषणा येथे पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती, संचालक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष-संचालक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता यवतमाळ बाजार समितीतील संघर्ष समितीचा मोर्चा निघणार आहे. पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकाऱ्यांना तुरीच्या घुगऱ्या देऊन प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार आहे. यानंतरही शासन मानले नाही तर तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन आणि त्यानंतर चक्काजाम करून जिल्हाबंदचा इशाराही देण्यात आला. पत्रपरिषदेला कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, मारेगावचे नरेंद्र ठाकरे, यवतमाळचे रवींद्र ढोक, दिग्रसचे साहेबराव चौधरी, नेरचे रवींद्र राऊत, उमरखेडचे कृष्णा देवसरकर, वणीचे संतोष कुचनकर, आर्णीचे राजेंद्र पाटील, बाबूपाटील दरणे, जितेंद्र कोंघारेकर, झरीचे पांडुरंग रोहे, देवानंद पवार, अशोक बोबडे, अरुण राऊत, अशोक भुतडा, अनिल गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते. आम्ही फक्त अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. टोकन देण्याचा अधिकार बाजार समितीला आहे. त्यांनी दिलेल्या टोकननुसार आम्ही मोजमाप केले. ते व्यापारी होते की शेतकरी हे सांगणे अवघड आहे. बाजार समितीने ते पाहणे गरजेचे आहे. शनिवारी गोंधळ उडाल्यावर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. - अशोक गुल्हानेजिल्हा व्यवस्थापक, विदर्भ को.आॅप. मार्केटिंग फेडरेशन