शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:31 IST

शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शासनाने शेती उत्पादीत प्रत्येक मालाचे हमी भाव जाहीर केले. हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापारी किंवा यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद पणन व विनियमन अधिनियमात केली आहे.

ठळक मुद्देहमीभाव फलकावरच : वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचीही चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शासनाने शेती उत्पादीत प्रत्येक मालाचे हमी भाव जाहीर केले. हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापारी किंवा यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद पणन व विनियमन अधिनियमात केली आहे. तरीही कायद्याला न जुमानता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून चना व तूर खरेदी करताना क्विंटलमागे एक हजार ते बाराशे रूपये कमी भाव देत आहे. शेतकऱ्यांची ही लूट बाजार समितीचे प्रशासन, पदाधिकारी, शासनाचे प्रतिनिधी उघड्या डोळ्यानी पाहत आहे. मात्र शेतकºयांचा कैवार घेण्याची कोणाचीही तयारी नाही.शासनाने कापूस, सोयाबीन, तूर, हरबरा या मालांचे हमी भाव जाहीर केले. मात्र शेतकºयांकडील सर्व माल खरेदी करण्यासाठी शासकीय यंत्रणा उभी करता आली नाही. नाफेडच्या सहकार्याने सोयाबीन, तूर व हरभरा खरेदी करण्यास सुरूवात केली. मात्र ही खरेदी अल्प काळासाठी सुरू ठेवण्यात आली. शेतकऱ्यांनी तूर, हरभरा विकण्यासाठी खरेदी-विक्री समितीकडे आॅनलाईन नोंदणी करून टोकण घेतले. शेतकऱ्यांकडे माल भरपूर होता. शासनाची खरेदी धिमीगतीने चालली. महिनाभर प्रतीक्षा करूनही शेतकरी आपला माल बाजार समितीच्या यार्डात आणत होते. मात्र शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूर व हरभरा संपण्यापूर्वीच नाफेडने तूर व हरभराची खरेदी बंद केली. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना आपला माल व्यापाºयांना विकावा लागत आहे. अजूनही बाजार समितीमध्ये दररोज ३०० ते ४०० क्विंटल धान्य विक्रीसाठी येत आहे. व्यापाऱ्यांना हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रूपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र यामध्येही अनेक अटी टाकून शेतकऱ्यांना यातून बाद करण्याचा प्रयत्न होत आहे. अनुदानाचे धोरणही स्पष्ट झालेले दिसत नही. व्यापारी शेतकऱ्यांकडून तूर तीन हजार ५०० रूपये, तर हरभरा दोन हजार ७०० ते तीन हजार रूपये प्रति क्विंटल दराने खरेदी करीत आहे. शासनाने हमी भाव तूर पाच हजार ४५० व हरभरा चार हजार रूपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे हजार-दीड हजार रूपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ही लूट होत असताना बाजार समितीचे पदाधिकारी किंवा अधिकारी चुप कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.मालाच्या सुरक्षेची हमी बाजार समितीवरयेथील बाजार समितीमध्ये दररोज खरेदी केलेला माल व्यापारी उघड्या शेडमध्ये ठेवतो. त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांनी बाजार समितीवर ढकलली आहे. बाजार समिती प्रशासनही व्यापाऱ्यांपुढे नमते होऊन त्यांनी आपले वॉचमन व्यापाऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेसाठी लावले आहे. यार्डात डुकरांचा सुळसुळाट आहे. त्यांना हाकता-हाकता वॉचमनच्या नाकिनऊ येत आहे. रात्रभर जागून पोत्यांची राखण करावी लागत आहे.शेतकऱ्यांची लेखी हमी घेऊन त्यांच्या संमतीने माल व्यापाऱ्यांना विकला जात आहे. ज्या शेतकऱ्यांना सध्याच्या दरात माल विकायचा नसेल, त्यांच्यासाठी बाजार समितीने तारण योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ७५ टक्के कर्ज मिळते. भाव वाढल्यावर शेतकरी माल विकू शकतात.- संतोष कुचनकार, सभापती

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी