शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:00 AM

मोजक्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली आहे. या ठिकाणी अ‍ॅव्हरेज घटला आहे. प्रारंभीचाच अ‍ॅव्हरेज घटल्याने मागाहून झालेल्या पेरणी क्षेत्रात उत्पन्नच येणार किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना ८ ते १० क्विंटलचा सरासरी अ‍ॅव्हरेज आला. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन ते सात क्विंटलपर्यंतच अ‍ॅव्हरेज आला आहे. हा अ‍ॅव्हरेज एकरात चार ते पाच क्विंटलने घटला आहे. यानंतरही शेतमालास भाव नाही, अशी संपूर्ण परिस्थिती आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला उताराच नाही : बिना दाण्याच्या शेंगा, एकरी दोन क्विंटलचेही पीक नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उशिरा सुरू झालेला पावसाळा, नंतर झडीस्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे शेती उत्पादन घटण्याची चिन्हे आहे. हाती आलेल्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल, अशी चिन्हे दिसत नाही. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांचे हे सर्व प्रश्न बाजुला फेकले गेले आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. शेतमाल खरेदीसाठीची कुठलीही तयारी नाही. यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रकाशपर्व साजरे करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अल्पावधीत हाती येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. या पिकावर रब्बीचे नियोजन केले जाते. उधारीवर घेतलेले हातउसने देण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीनचा उताराच आला नाही. लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याचाच धोका आहे.पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे. मजुरांअभावी अनेकांना सोयाबीन सोंगता आले नाही. तर अनेक शेतकºयांना परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. काही मोजक्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली आहे. या ठिकाणी अ‍ॅव्हरेज घटला आहे. प्रारंभीचाच अ‍ॅव्हरेज घटल्याने मागाहून झालेल्या पेरणी क्षेत्रात उत्पन्नच येणार किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना ८ ते १० क्विंटलचा सरासरी अ‍ॅव्हरेज आला. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन ते सात क्विंटलपर्यंतच अ‍ॅव्हरेज आला आहे. हा अ‍ॅव्हरेज एकरात चार ते पाच क्विंटलने घटला आहे. यानंतरही शेतमालास भाव नाही, अशी संपूर्ण परिस्थिती आहे.उत्पादन घटण्याची प्रमुख कारणेजिल्ह्यात यावर्षी दोन लाख ६७ हजार ३४७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. अल्पावधीत हाती येणारे पीक अतिपावसाने क्षमतेपेक्षा अधिक वाढले. यासोबतच गवताचे प्रमाण वाढले. तणनाशकानंतरही हे गवत मेले नाही. यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा परिपक्व झाल्या नाही. मिरचीचे बी असावे असे सोयाबीनचे दाणे आहेत. तिळ आणि ज्वारीइतके बारीक दाणे तयार झाले आहे. पिकांना हवा असलेला सूर्यप्रकाश मिळाला नाही. किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. उंटअळी, खोडकिडी, पांढरी माशी या प्रकारामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. यातून सोयाबीनचे उत्पादन घटले. काळीच्या जमिनीत क्षमतेपेक्षा अधिक पाणी आले. यातून मुळाची वाढ झाली नाही. त्याला पांढऱ्या गाठी पकडल्या नाही. पिकाला ताण बसला नाही. यामुळे शेंगा कसल्या नाही. यातून सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. भरकाच्या जमिनीत काळीच्या जमिनीपेक्षा अधिक उतारा आला आहे.शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाखर्चालाही परवडेनायावर्षीचे पीक अतिपावसाने वाया गेले. कापणीनंतर हातात आलेल्या उत्पन्नानंतरच याचे वास्तव उलगडले. अर्धीअधिक शेती चिबडली. येणारे प्रत्येक वर्ष शेतीसाठी अवघड होत चालले आहे. शेती खर्चालाही परवडेनाशी झाली आहे.- शशांक बेंद्रे 

शेती सोडून रोजमजुरीच करूघरातले तीन कमावते माणसं शेतात राबराब राबत आहे. त्यांनी शेती सोडून इतर ठिकाणी रोजमजुरी केली तरी प्रत्येकला सहा हजार रूपये महिना पडतो. तिघांना महिन्याकाठी २० हजारनुसार वर्षाला अडीच लाख होतात. मात्र ही मेहनत शेतात केली तर हातात पाच पैसे राहण्याची शाश्वती नाही. उलट कर्ज होत आहे. यामुळे पुढील काळात शेती सोडून रोजमजुरीच करू.- प्रवीण ठाकरे

दिवाळी अंधारात जाणारसोयाबीनची काढणी केल्यावर येणाºया पैशातून जुनी परतफेड आणि रब्बीच्या पेरणीचे नियोजन होते. आता एकरी उत्पन्नच घटले आहे. काही भाग तर सोंगावा का नाही असा विचार पडला आहे. अशा स्थितीत दिवाळी तोंडावर आली आहे. ही दिवाळी अंधारात जाईल, अशी आमची अवस्था आहे.- मनिष जाधव 

उत्पादन घटले, भाव पडलेजे सोयाबीन काढणीला आले. त्याची काढणी करण्यात आली. तर एकूण उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. हे सोयाबीन बाजारात न्यायचे ठरविले तर बाजारात सोयाबीनचे दर पडले आहे. आधी ३८०० रूपये क्विंटल असलेले सोयाबीन ३५०० पर्यंत खाली घसरले आहे. यामुळे शेतकºयांना दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.- अनिल लांडगे सोयाबीन शेंगा भरल्याच नाहीयावर्षी सोयाबीनची अवस्था भयंकर खराब आहे. एकरी उत्पादन न विचारलेलेच बरे. वरच्या शेंगा भरल्या, मधातल्या शेंगा बारकावल्या आणि खालच्या शेंगामध्ये दाणेच भरले नाही. अशी संपूर्ण अवस्था आहे. यातून उत्पन्न घटले आहे.- अजय डवले 

टॅग्स :Farmerशेतकरी