विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार
By Admin | Updated: August 7, 2015 02:16 IST2015-08-07T02:16:45+5:302015-08-07T02:16:45+5:30
शेताच्या कुंपनात प्रवाहित झालेल्या विजेचा धक्का लागून शेतकरी ठार झाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लखमापूर शिवारात गुरुवारी सकाळी उजेडात आली.

विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार
लखमापूरची घटना : शेत कुंपनात प्रवाह
सोनखास : शेताच्या कुंपनात प्रवाहित झालेल्या विजेचा धक्का लागून शेतकरी ठार झाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लखमापूर शिवारात गुरुवारी सकाळी उजेडात आली.
पुनाजी गोमाजी गाडेकर (५५) रा. लखमापूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पुनाजीने यावर्षी एक शेत मक्त्याने घेतले होते. त्याची रखवाली करण्यासाठी रात्री ते शेतात गेले. मात्र शेताच्या कुंपनात असलेल्या वीज प्रवाहाचा जबर धक्का त्यांना बसला आणि त्यातच ते ठार झाले. याच सोबत ताराचंद सवाई आडे यांच्या मालकीची एक गायही ठार झाली. पती घरी परत आला नाही म्हणून त्यांची पत्नी इंदिराबाई शोधण्यासाठी शेतात गेल्या असता पुनाजी तार कुंपनात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वन्य प्राण्यांचा शेतात मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असल्याने शेतकऱ्यांना रात्री रखवालीसाठी जावे लागते. त्यातच ही घटना घडली. (वार्ताहर)