शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

शेतकरी भाकरी बांधून कर्जमाफीच्या केंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:01 AM

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत तब्बल दोन लाख शेतकºयांना अर्ज सादर करायचे आहे.

ठळक मुद्देआज शेवटचा दिवस : दिवसभरात दोन लाख अर्ज मार्गी लावण्याचे आव्हान, सर्वच केंद्रांवर स्थिती सारखीच

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत तब्बल दोन लाख शेतकºयांना अर्ज सादर करायचे आहे. कर्जमाफीसाठी जिवाच्या आकांताने हे शेतकरी चक्क भाकरी बांधून आॅनलाईन केंद्रांवर धडकत असल्याचे हृदयद्रावक चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येते.राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र अनेक जाचक अटी लादल्या. या अटींमुळे सर्वच शेतकरी त्रस्त आहे. या अटी व अडचणींबाबत विरोधकही मूग गिळून आहे. काही संघटना सतत याविरूद्ध आवाज उठवीतात. मात्र त्यांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचतच नाही. यामुळे शेतकरी वैतागले. अनेक शेतकºयांनी तर ‘भीक नको पण कुत्रा आवर’, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.कर्जमाफीमुळे काही प्रमाणात का होईना आपल्या कुटुंबाला आीर्थक अडचणींतून सोडविण्यास हातभार लागेल, या आशेने अनेक शेतकरी आॅनलाईन केंद्रावर कर्जमाफीची अर्ज भरून देण्यासाठी जात आहे. अनेक अडचणींवर मात करून गेल्या ५० दिवसांत जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र त्यांनाही कर्जमाफी होईल की नाही, याची हुरहुर लागली.आता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस येऊन ठेपला आहे. शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. या एका दिवसांत एक लाख ७३ हजार शेतकºयांना अर्ज भरायचे आहे. मात्र आॅनलाईन केंद्रांची गती मंदावली आहे. परिणामी शेकडो शेतकरी चक्क भाकरी बांधून या केंद्रांवर पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बळीराजाची अशी अवहेलना आत्तापर्यंत कधीच झाली नाही. प्रशासन मात्र शेतकºयांमुळेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या शक्यतेने पोलीस बंदोबस्त लावण्याच्या तयारीत आहे.भारनियमनाची भरआॅनलाईन अर्जाची लिंक फेल असणे, थम्ब स्वीकार न होणे, मोबाईल नंबर नसणे, आधार कार्ड नसणे, आदी बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यांना अर्ज भरणे कठीण झाले आहे. आता या अडचणींत भारनियमनाची भर पडली आहे. यातून मार्ग काढत उद्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी एक लाख ७९ हजार २०५ शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे दीव्य पार पाडावे लागणार आहे.