शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

राळेगावात शेतकऱ्यांचा कल खासगी खरेदीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 6:00 AM

खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन हजार ८०० आणि खैरी पाच हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. राळेगावात सात, वाढोणाबाजार तीन, खैरी येथे एक व्यापारी खरेदीत उतरले आहे.

ठळक मुद्देखासगी खरेदी ८० हजार क्विंटल : सीसीआयकडे केवळ १२ हजार क्विंटल

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राळेगाव, वाढोणाबाजार व खैरी येथील मार्केट यार्डवरील खासगी कापूस खरेदीत सद्यस्थितीत चार हजार ७०० ते पाच हजार रुपयांपर्यंतचे दर शेतकऱ्यांना मिळत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारितील सीसीआयची खरेदी तालुक्यात राळेगाव, वाढोणाबाजार व खैरी येथे सुरू झाली आहे.खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन हजार ८०० आणि खैरी पाच हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. राळेगावात सात, वाढोणाबाजार तीन, खैरी येथे एक व्यापारी खरेदीत उतरले आहे.राळेगावला दररोज सरासरी पाच-सात हजार, वाढोणात एक हजार क्विंटल कापूस खासगीत खरेदी केला जात आहे. खासगीत खरेदीच्या तुलनेत सीसीआयची खरेदी केवळ १२-१३ टक्के एवढीच आहे. खासगीत कापूस विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटल मागे ५०० ते ८०० रुपये नुकसान होत आहे. त्यात नगदी पैसे, आत्ताच पाहिजे या आग्रहामुळे ते स्वत:चे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेत असल्याचे मार्केटमध्ये फेरफटका मारला असता चर्चेअंती समजले.बाजार समिती व सीसीआयकडून अपेक्षासीसीआयला कापूस विकू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकरिता मार्केट यार्डवर बाजार समितीने वेगळे ठिकाण वाहन व बैलबंड्यांकरिता राखून ठेवण्याची गरज आहे. त्यातच समितीने शेतकऱ्यांचा कापसाचा ओलावा (मॉइश्चर) मोजून तो प्रमाणित प्रतीवर उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले. सीसीआयनेही १२ टक्के ओलाव्याची अट दरवेळी धरून न ठेवता शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता ठेवावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अट थोडीफार शिथील करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी त्याकरिता आवाज उचलण्याची गरजही व्यक्त होत आहे. मार्केट यार्डात व्यापाºयांच्या गराड्यात सीसीआयला शोधणे कठीण जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड