शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शेतकरी, कृषी केंद्रांना खताची उधारी बंदचा फटका बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:28 AM

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. ...

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. खताच्या भरवशावर हा व्यवसाय चालतो. त्यामुळे यात काही व्यावसायिक, तसेच याचा फायदा घेत काहींकडून मनमानी झाल्यास शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. कृषी केंद्रांचा व्यवसाय जास्त प्रमाणात उधारीवर चालतो. शेतकऱ्यांकडील वसुलीच्या भरवशावर पुढील हंगामाचे नियोजन केले जाते; परंतु सतत दोन हंगामात कोरोनामुळे वसुली अडकून पडल्याने रासायनिक खते, बियाणांची बुकिंगची टक्केवारी घसरल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

तालुक्यात एकूण ७२ कृषी केंद्रे आहेत. या हंगामी व्यवसायाकरिता खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. यासाठी लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून बियाणे आणि खतांचे मिळून प्रत्येकी जवळपास १५ ते ४० लाखांपर्यंत बुकिंग केले जाते. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी बियाणांसह विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा समावेश असतो. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आजाराची भीती, सतत संचारबंदी, लाॅकडाऊन आदींमुळे शेती व्यवसायाचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी केंद्राच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला.

पूर्वी रासायनिक खते गोडाऊन स्कीमवर क्रेडिटवर मिळत होते. उन्हाळ्यात खरेदी केल्यानंतर २१ ते ३० जूनपर्यंत पेमेंट देण्याची सवड मिळायची. त्यामुळे जवळपास सर्वच कृषी केंद्रात खत येत होते. मे महिन्यात, तसेच जूनमध्ये बियाणासोबतही खताची विक्री होत होती. त्यात पैसे वसूल होत असल्याने कृषी केंद्राचे व्यवस्थापन व्यवस्थित चालत होते.

बॉक्स

कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची गरज

आता एक रुपयाचेही खत उधारित मिळत नाही. गोडाऊन स्कीम बंद झाली. एक ट्रक घ्यायचा म्हणजे पाच लाख रुपये नगदी भरावे लागतात. त्यावर पाच हजारांचा नफा मिळतो. फेब्रुवारीपासून तेवढे पैसे अडकून पडल्यास त्याचे व्याजही भरून निघणे मुश्कील आहे. यामुळे नगदी खताची खरेदी करून चार महिने वागवायचे आणि आता जूनमध्ये विक्री करायची, हे छोट्या व्यावसायिकांना शक्य झाले नाही. आता खरेदी करायची म्हटले, तर रॅक लागत नसल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत काहींकडून खते, बियाणांच्या खरेदीत मनमानी केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची, तसेच या व्यवहारावर कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

कोट

बियाणे, खते व इतर साहित्याच्या व्यवहारांकडे पूर्ण लक्ष आहे. शेतकऱ्यांची फसवणूक किंवा मनमानी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तरीसुद्धा काही अडचण, तक्रार असल्यास संपर्क साधावा.

राजीव शिंदे, गटविकास अधिकारी, दारव्हा