शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना

By admin | Published: December 22, 2014 10:56 PM

वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता

गणेश रांगणकर - नांदेपेरावणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.सध्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडतच आहे. शेतकऱ्यांसोबतच त्यांचे कुटुंबही मरणयातना सोसत आहे. कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्यांची पत्नी, मुले, त्यांचे होणारे हाल, हे कुणालाच दिसत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यात अजूनपर्यंत शासन व प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकरी जिवंत असताना त्याला घर संसार चालविणे, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा एकाहून एक समस्यांचा डोंगर पार करावा लागतो. शेतकरी एकेक समस्या दूर करण्याकरिता बँक, सावकारांकडून कर्ज काढतो. मात्र ते कर्ज कमी न होता दरवर्षी वाढतच जाते. त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. परंतु शासन व प्रशासन जिवंत शेतकऱ्याला मदत करीत नाही. त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला ‘शेतकरी आत्महत्या’ असे गोंडस शिर्षक देऊन शासन व प्रशासन खडबडून जागे होते. त्यांचा कुटुंबाला भेट देते. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला एक लाखाची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्तही होते. ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर आता अनेक लोकप्रतिनिधी राजकारणही करताना दिसतात. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची प्रचंड अवहेलना होते. आमचीच माती अन् आमचाच बळी, आमचेच हाल, अशी भावना त्या कुटुंबाची होते. मात्र मदत करायला हात पुढे येतच नाही. चार दिवस दुख: व्यक्त केल्यानंतर सर्वांनाच त्यांचा विसर पडतो.