शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना

By admin | Updated: December 22, 2014 22:56 IST

वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता

गणेश रांगणकर - नांदेपेरावणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.सध्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडतच आहे. शेतकऱ्यांसोबतच त्यांचे कुटुंबही मरणयातना सोसत आहे. कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्यांची पत्नी, मुले, त्यांचे होणारे हाल, हे कुणालाच दिसत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यात अजूनपर्यंत शासन व प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकरी जिवंत असताना त्याला घर संसार चालविणे, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा एकाहून एक समस्यांचा डोंगर पार करावा लागतो. शेतकरी एकेक समस्या दूर करण्याकरिता बँक, सावकारांकडून कर्ज काढतो. मात्र ते कर्ज कमी न होता दरवर्षी वाढतच जाते. त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. परंतु शासन व प्रशासन जिवंत शेतकऱ्याला मदत करीत नाही. त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला ‘शेतकरी आत्महत्या’ असे गोंडस शिर्षक देऊन शासन व प्रशासन खडबडून जागे होते. त्यांचा कुटुंबाला भेट देते. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला एक लाखाची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्तही होते. ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर आता अनेक लोकप्रतिनिधी राजकारणही करताना दिसतात. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची प्रचंड अवहेलना होते. आमचीच माती अन् आमचाच बळी, आमचेच हाल, अशी भावना त्या कुटुंबाची होते. मात्र मदत करायला हात पुढे येतच नाही. चार दिवस दुख: व्यक्त केल्यानंतर सर्वांनाच त्यांचा विसर पडतो.