शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना

By admin | Updated: December 22, 2014 22:56 IST

वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता

गणेश रांगणकर - नांदेपेरावणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.सध्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडतच आहे. शेतकऱ्यांसोबतच त्यांचे कुटुंबही मरणयातना सोसत आहे. कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्यांची पत्नी, मुले, त्यांचे होणारे हाल, हे कुणालाच दिसत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यात अजूनपर्यंत शासन व प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकरी जिवंत असताना त्याला घर संसार चालविणे, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा एकाहून एक समस्यांचा डोंगर पार करावा लागतो. शेतकरी एकेक समस्या दूर करण्याकरिता बँक, सावकारांकडून कर्ज काढतो. मात्र ते कर्ज कमी न होता दरवर्षी वाढतच जाते. त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. परंतु शासन व प्रशासन जिवंत शेतकऱ्याला मदत करीत नाही. त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला ‘शेतकरी आत्महत्या’ असे गोंडस शिर्षक देऊन शासन व प्रशासन खडबडून जागे होते. त्यांचा कुटुंबाला भेट देते. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला एक लाखाची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्तही होते. ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर आता अनेक लोकप्रतिनिधी राजकारणही करताना दिसतात. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची प्रचंड अवहेलना होते. आमचीच माती अन् आमचाच बळी, आमचेच हाल, अशी भावना त्या कुटुंबाची होते. मात्र मदत करायला हात पुढे येतच नाही. चार दिवस दुख: व्यक्त केल्यानंतर सर्वांनाच त्यांचा विसर पडतो.