शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना

By admin | Updated: December 22, 2014 22:56 IST

वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता

गणेश रांगणकर - नांदेपेरावणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.सध्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडतच आहे. शेतकऱ्यांसोबतच त्यांचे कुटुंबही मरणयातना सोसत आहे. कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्यांची पत्नी, मुले, त्यांचे होणारे हाल, हे कुणालाच दिसत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यात अजूनपर्यंत शासन व प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकरी जिवंत असताना त्याला घर संसार चालविणे, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा एकाहून एक समस्यांचा डोंगर पार करावा लागतो. शेतकरी एकेक समस्या दूर करण्याकरिता बँक, सावकारांकडून कर्ज काढतो. मात्र ते कर्ज कमी न होता दरवर्षी वाढतच जाते. त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. परंतु शासन व प्रशासन जिवंत शेतकऱ्याला मदत करीत नाही. त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला ‘शेतकरी आत्महत्या’ असे गोंडस शिर्षक देऊन शासन व प्रशासन खडबडून जागे होते. त्यांचा कुटुंबाला भेट देते. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला एक लाखाची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्तही होते. ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर आता अनेक लोकप्रतिनिधी राजकारणही करताना दिसतात. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची प्रचंड अवहेलना होते. आमचीच माती अन् आमचाच बळी, आमचेच हाल, अशी भावना त्या कुटुंबाची होते. मात्र मदत करायला हात पुढे येतच नाही. चार दिवस दुख: व्यक्त केल्यानंतर सर्वांनाच त्यांचा विसर पडतो.