कृषी संजीवनी योजना ठरेल शेतकऱ्यांसाठी वरदान
By Admin | Updated: August 26, 2014 00:16 IST2014-08-26T00:16:34+5:302014-08-26T00:16:34+5:30
शेतकऱ्यांकडे असलेले कृषिपंपांचे थकीत बील भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने बाभुळगाव येथील इंदिरा चौकात वीज वितरण कंपनीतर्फे

कृषी संजीवनी योजना ठरेल शेतकऱ्यांसाठी वरदान
बाभूळगाव : शेतकऱ्यांकडे असलेले कृषिपंपांचे थकीत बील भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने बाभुळगाव येथील इंदिरा चौकात वीज वितरण कंपनीतर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे कार्यकारी अभियंता पंकज तगलपल्लेवार होते. कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असे प्रतिपादन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
या कार्यक्रमात एकमुस्त वीज बील भरणाऱ्या पाच शेतकऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाभूळगावचे सरपंच मारोतराव गाजलेकर, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अमर घारफळकर, दिनकर कोंबे, वीज सल्लागार नरेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर जुनगरे, उप कार्यकारी अभियंता एस.व्ही. झाडे, माजी सरपंच भारत इंगोले आदी उपस्थित होते.
कृषी ग्राहकांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकमुस्त किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे महावितरणला देण्यात येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत कृषी ग्राहकांचे थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड माफ करण्यात आला आहे.
उरलेल्या ५० टक्के रकमेचे तीन हप्ते पाडून दिले जाणार आहे. त्यामध्ये ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत कमीतकमी २० टक्के बील भरने अनिवार्य आहे, अशी माहिती अभियंता झाडे यांनी आपल्या भाषणा दिली. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनसुद्धा झाडे यांनी केले.
यावेळी तालुक्यातील पूर्ण वीज बील एकमुस्त भरणारे शेतकरी मनोहर एकनाथ भोयर, गोदाबाई घुले, नामदेव गोडे, दीपक कराळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी बाभूळगाव उपविभागातील सहाय्यक अभियंता संजय कांबळे, नवनीत सावरकर, विजय साव, शेख रहीम, नीलेश गाडगे, विशाल कडू, सुनील राऊत, आस्वले, जीवन दहापुते आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)