शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

शेतकरी जीएसटीच्या जोखडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:51 PM

शेतकऱ्यांना लुटण्यासाठी शासन कोणतीच संधी सोडत नाही. जीएसटी ही केंद्रीय कर प्रणाली असल्याने एक वेळा दिल्यानंतर पुन्हा लागत नाही. मात्र शेतकऱ्याला पीक कर्ज घेतानाही जीएसटी द्यावी लागते. बाजारातून खते, कीटकनाशक व इतर कृषी साहित्य खरेदी करतानाही जीएसटी मोजावीच लागते.

ठळक मुद्देपीक कर्जासाठीही कर : खते, कीटकनाशके घेताना पुन्हा वसुली

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांना लुटण्यासाठी शासन कोणतीच संधी सोडत नाही. जीएसटी ही केंद्रीय कर प्रणाली असल्याने एक वेळा दिल्यानंतर पुन्हा लागत नाही. मात्र शेतकऱ्याला पीक कर्ज घेतानाही जीएसटी द्यावी लागते. बाजारातून खते, कीटकनाशक व इतर कृषी साहित्य खरेदी करतानाही जीएसटी मोजावीच लागते. शेतकऱ्याची चहुबाजूने लूट करण्याचा घाट शासनाने घातला आहे. यावर एकही शेतकरी नेता बोलताना दिसत नाही.राष्ट्रीयकृत बँका व शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा दरवर्षी पीक कर्ज मंजुरीसाठी प्रक्रिया शुल्क शेतकऱ्यांकडून वसूल करते. जिल्हा बँकेने ५० हजारापर्यंतच्या कर्जासाठी दीडशे रुपये प्रक्रिया शुल्क, एक लाखापर्यंत २०० रुपये आणि त्या पेक्षा अधिक रकमेवर ३०० रुपये शुल्क आकारले जाते. प्रक्रिया शुल्कावर १८ टक्के जीएसटी लावण्यात येते. यातून मिळणारी रक्कम ५० टक्के बँकेला व ५० टक्के सहकारी संस्थेला जाते. राष्ट्रीयकृत बँकांची पद्धत यापेक्षा वेगळी असून कर्ज मंजुरीसाठी स्टॅम्प ड्युटी व इन्स्पेक्शन चार्जेस लावले जातात. इन्स्पेक्शन चार्जेसची रक्कम निश्चित असून ७०८ रुपयांमध्ये जीएसटीही अंतर्भूत आहे. शासनाला विविध मार्गाने सतत महसूल देणाऱ्या शेतकऱ्याला कुठेच सोडले जात नाही. बाजारात माल विक्रीला घेऊन गेल्यानंतर तेथेही व्यापारी सर्व प्रकारचे चार्जेस शेतकऱ्यांकडूनच वसूल करतो. शेतमालाच्या भावातही त्याला नाडतो. लुटीची ही श्रृंखला येथेच संपत नाही. कर्ज घेण्यासाठी जीएसटी मोजलेल्या शेतकऱ्याला बाजारातून वस्तू खरेदी करतानाही प्रत्येक बाबीसाठी जीएसटी द्यावा लागतो. कृषी साहित्यातही कुठलीच सवलत मिळत नाही. एकीकडे सर्वच राजकीय पक्ष शेती व त्यांच्या समस्या याचे भांडवल करून आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी देखावा निर्माण करतात. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीवर पोटतिडकीने बोलणारे शेतकरी नेतेही गप्प आहेत. पीक कर्जासाठी मोजावी लागणारी जीएसटीची रक्कम अत्यल्प वाटत असली तरी आर्थिक दृष्ट्या कृष झालेल्या शेतकऱ्यासाठी ती जीवघेणी ठरणारीच आहे. पावलोपावली होणारी लूट थांबविण्यासाठी शेतकºयांकरिता चांगले कृषी धोरण आणण्याची गरज आहे.सर्वांचेच होतेय दुर्लक्षपीक कर्ज वाटपात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा बँकेच्या राजकारणावर साऱ्याच राजकीय पक्षांच्या नजरा आहेत. मात्र पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांची लूट होत असताना त्याकडे ना सत्ताधारी ना विरोधक लक्ष द्यायला तयार आहेत. त्यामुळे रोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGSTजीएसटी