शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

बा... शेतकऱ्या, आत्महत्या करू नकोस... फिनिक्स हो....! एनजीओ आली शेतकऱ्यांच्या मदतीला धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:58 IST

एनजीओंनी घातली साद : आत्महत्या टाळण्यासाठी प्रयत्न

संतोष कुंडकर लोकमत न्यूज नेटवर्क वणी : गेल्या काही वर्षांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारचे शेतीविषयक चुकीचे धोरण, शेतीचा वाढलेला खर्च, त्या तुलनेत उत्पादनाला मिळणारे कमी भाव, यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. नैराश्यातून शेतकरी मृत्यूला जवळ करू लागले आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे, या हेतूने, 'बा शेतकऱ्या आत्महत्या करू नको... फिनिक्स हो..राखेतून भरारी घे', अशी साद घालत अॅफ्रो ही एनजीओ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे.

उपविभागातील वणी व मारेगाव या दोन तालुक्यांतील ४८ गावांमध्ये अॅफ्रो अर्थात अॅक्शन फॉर फूड प्रॉडक्शन ही एनजीओ शेतकऱ्यांसोबत काम करीत आहे. तब्बल चार हजार १२८ शेतकऱ्यांशी ही संस्था सातत्याने संवाद साधत आहे. आठवड्यातून तीन दिवस या संस्थेचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांना मार्गदर्शन करतात. 

शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत झाला, तर त्याच्यावर आत्महत्येची पाळी येणार नाही. त्यासाठी शेतीवर होणारा खर्च कमी व्हावा, यासाठी ही एनजीओ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. उत्पादन वाढीसाठी गरज असेल तेथे सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा वापर किती व कसा करावा यासाठी ही संस्था शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे. मूळच्या अहमदनगर येथील या संस्थेकडून वणी-मारेगाव तालुक्यासाठी अतुल नत्थूजी पिदूरकर हे प्रोजेक्ट युनिट मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यांच्या समवेत १२ कार्यकर्ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. या संस्थेच्या प्रयत्नांना यशही आले असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

कोलाम समाजात आत्महत्येचे प्रमाण कमी मारेगाव तालुक्यात कोलाम समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण या समाजात कमी आहे, असे या संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. हा समाज शेती व्यतिरिक्त रानात मिळणाऱ्या नैसर्गिक उत्पादनातून अर्थार्जन करतात. डिंक, तेंदूपत्ता, चार गोळा करून त्यातून पैसे मिळवितात.

तरुणाईची शेतीकडे पाठ गेल्या काही वर्षांत तरुणाईने शेतीकडे पाठ फिरविली आहे. घरात दोन मुले असतील, तर ती मुले शेती करण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे एकट्या वडिलांना मजुरांच्या भरवशावर शेती कसावी लागते. त्यामुळे शेतीचा खर्चही वाढतो. तरुणाई शेतीऐवजी नोकरीला प्राधान्य देत असल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळते.

"शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत व्हावा, यासाठी सरकारने शेतकऱ्यांविषयी असलेले आपले धोरण बदलावे. शेतकऱ्यांनी खचून न जाता शेती व्यवसाय करावा. शेतीसोबतच एखादा जोड व्यवसायही करावा. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल." - अतुल पिदूरकर, प्रोजेक्ट युनिट मॅनेजर, अॅफ्रो

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीfarmingशेती