शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:01 IST

वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.

ठळक मुद्देगळीत हंगामावर प्रश्नचिन्ह : ३० महिन्यांपासून वेतनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. आर्थिक विपन्नावस्थेत गेलेल्या या कारखान्यातील कामगारांना गत ३० महिन्यांपासून वेतन नाही. भाजपाने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतल्यानंतर परिस्थितीत तसूभर सुधारणा झाली नाही.पुसद, उमरखेड, महागाव यासह मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर तालुक्यासाठी वसंत सहकारी साखर कारखाना कामधेनू आहे. १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने हा कारखाना सुरू झाला. २०१५ पर्यंत या कारखान्याने सलग गाळप केले. त्यामुळे परिसरात समृद्धी आली. ऊस उत्पादक कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. गत काही वर्षापासून कारखान्याला उतरती कळा लागली. कामगारांचे देणे थकीत होत गेले. गत ३० महिन्यांपासून कामगारांच्या वेतनाचे आठ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. परंतु उपयोग झाला नाही.या कारखान्याची अवस्था बघता निवडणूक अविरोध करून माजी आमदार माधवराव पाटील यांना अध्यक्ष तर कृष्णा देवसरकर यांना उपाध्यक्ष करण्यात आले. त्यांनी गतवर्षी कसाबसा गाळप हंगाम सुरू केला. परंतु कारखान्याच्या इतिहासातील निच्चांकी गाळप गतवर्षी करण्यात आले. कामगारांनी वेतनासाठी आंदोलन केले. त्याचदरम्यान ५०० कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्यात आले. परंतु कारखान्याची आर्थिकस्थिती सुधारली नाही. दरम्यान वसंतच्या अध्यक्षपदाचा माधवराव पाटलांनी राजीनामा दिला.भाजपाचे अ‍ॅड.माधवराव माने अध्यक्ष झाले. भाजपची सत्ता असल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु अद्यापही गळीत हंगाम सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. शासनानेही कोणतीही मदत केली नाही. परिणामी कारखाना बंद आहे. कारखान्याला कायमचे टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.दिवाळीही गेली अंधारातवसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना ३० महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच ऊस उत्पादकांनाही वाढीव रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कामगारांसोबतच या भागातील शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. कारखाना कधी सुरू होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.