शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:01 IST

वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.

ठळक मुद्देगळीत हंगामावर प्रश्नचिन्ह : ३० महिन्यांपासून वेतनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. आर्थिक विपन्नावस्थेत गेलेल्या या कारखान्यातील कामगारांना गत ३० महिन्यांपासून वेतन नाही. भाजपाने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतल्यानंतर परिस्थितीत तसूभर सुधारणा झाली नाही.पुसद, उमरखेड, महागाव यासह मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर तालुक्यासाठी वसंत सहकारी साखर कारखाना कामधेनू आहे. १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने हा कारखाना सुरू झाला. २०१५ पर्यंत या कारखान्याने सलग गाळप केले. त्यामुळे परिसरात समृद्धी आली. ऊस उत्पादक कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. गत काही वर्षापासून कारखान्याला उतरती कळा लागली. कामगारांचे देणे थकीत होत गेले. गत ३० महिन्यांपासून कामगारांच्या वेतनाचे आठ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. परंतु उपयोग झाला नाही.या कारखान्याची अवस्था बघता निवडणूक अविरोध करून माजी आमदार माधवराव पाटील यांना अध्यक्ष तर कृष्णा देवसरकर यांना उपाध्यक्ष करण्यात आले. त्यांनी गतवर्षी कसाबसा गाळप हंगाम सुरू केला. परंतु कारखान्याच्या इतिहासातील निच्चांकी गाळप गतवर्षी करण्यात आले. कामगारांनी वेतनासाठी आंदोलन केले. त्याचदरम्यान ५०० कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्यात आले. परंतु कारखान्याची आर्थिकस्थिती सुधारली नाही. दरम्यान वसंतच्या अध्यक्षपदाचा माधवराव पाटलांनी राजीनामा दिला.भाजपाचे अ‍ॅड.माधवराव माने अध्यक्ष झाले. भाजपची सत्ता असल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु अद्यापही गळीत हंगाम सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. शासनानेही कोणतीही मदत केली नाही. परिणामी कारखाना बंद आहे. कारखान्याला कायमचे टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.दिवाळीही गेली अंधारातवसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना ३० महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच ऊस उत्पादकांनाही वाढीव रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कामगारांसोबतच या भागातील शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. कारखाना कधी सुरू होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.