शहरं
Join us  
Trending Stories
1
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
2
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
3
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
4
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
5
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
6
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
7
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
8
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
9
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
10
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
11
Stock Market Today: कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला
12
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
13
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
14
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
15
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
16
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
17
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
18
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
19
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
20
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:01 IST

वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.

ठळक मुद्देगळीत हंगामावर प्रश्नचिन्ह : ३० महिन्यांपासून वेतनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. आर्थिक विपन्नावस्थेत गेलेल्या या कारखान्यातील कामगारांना गत ३० महिन्यांपासून वेतन नाही. भाजपाने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतल्यानंतर परिस्थितीत तसूभर सुधारणा झाली नाही.पुसद, उमरखेड, महागाव यासह मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर तालुक्यासाठी वसंत सहकारी साखर कारखाना कामधेनू आहे. १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने हा कारखाना सुरू झाला. २०१५ पर्यंत या कारखान्याने सलग गाळप केले. त्यामुळे परिसरात समृद्धी आली. ऊस उत्पादक कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. गत काही वर्षापासून कारखान्याला उतरती कळा लागली. कामगारांचे देणे थकीत होत गेले. गत ३० महिन्यांपासून कामगारांच्या वेतनाचे आठ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. परंतु उपयोग झाला नाही.या कारखान्याची अवस्था बघता निवडणूक अविरोध करून माजी आमदार माधवराव पाटील यांना अध्यक्ष तर कृष्णा देवसरकर यांना उपाध्यक्ष करण्यात आले. त्यांनी गतवर्षी कसाबसा गाळप हंगाम सुरू केला. परंतु कारखान्याच्या इतिहासातील निच्चांकी गाळप गतवर्षी करण्यात आले. कामगारांनी वेतनासाठी आंदोलन केले. त्याचदरम्यान ५०० कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्यात आले. परंतु कारखान्याची आर्थिकस्थिती सुधारली नाही. दरम्यान वसंतच्या अध्यक्षपदाचा माधवराव पाटलांनी राजीनामा दिला.भाजपाचे अ‍ॅड.माधवराव माने अध्यक्ष झाले. भाजपची सत्ता असल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु अद्यापही गळीत हंगाम सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. शासनानेही कोणतीही मदत केली नाही. परिणामी कारखाना बंद आहे. कारखान्याला कायमचे टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.दिवाळीही गेली अंधारातवसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना ३० महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच ऊस उत्पादकांनाही वाढीव रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कामगारांसोबतच या भागातील शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. कारखाना कधी सुरू होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.