शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
5
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
6
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
7
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
8
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
9
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
10
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
11
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
12
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
13
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
14
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
15
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
16
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
17
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
18
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
19
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
20
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर्णी ५०.६, नेर ३९.१, पुसद ५०.८, उमरखेड ११२.१, महागाव ८०.२, वणी १७.२, मारेगाव २४.४, झरी जामणी १३.६, केळापूर २५.५, घाटंजी ४६.१ तर राळेगाव तालुक्यात ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग दुसऱ्या दिवशी यवतमाळ शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले. यवतमाळसह कळंब, उमरखेड आणि महागाव या चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून उमरखेडमध्ये विक्रमी ११२.०१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. तर त्या पाठोपाठ महागावमध्ये ८०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर्णी ५०.६, नेर ३९.१, पुसद ५०.८, उमरखेड ११२.१, महागाव ८०.२, वणी १७.२, मारेगाव २४.४, झरी जामणी १३.६, केळापूर २५.५, घाटंजी ४६.१ तर राळेगाव तालुक्यात ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली. जून-जुलै या महिन्यात जिल्ह्यात साधारण ४२०.६ मिमी पाऊस होतो. बुधवारपर्यंत ५५५.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९२६ मिमी इतकी आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६७०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस ७८.२ टक्के इतका आहे. मागील वर्षी याच तारखेला जिल्ह्यात ६२ टक्के पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात जवळपास २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. मात्र सोमवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आता शेतकरीच संकटात सापडले आहे. कपाशी, सोयाबीन आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे पिके सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची अपेक्षा आहे. 

घानमुख येथे अतिवृष्टीमुळे मातीबांध वाहून गेला- बिजोरा : महागाव तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे घानमुख सिंचन तलाव ओसंडून वाहू लागला. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सांडव्यालगतचा मातीबांध पूर्णतः वाहून गेला आहे. पाण्यामुळे त्या खालील शेती खरडली व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. - सन २००३ मध्ये हा तलाव पूर्णत्वास आला, असे देविदास मोहकर यांनी सांगितले. कालव्याच्या सांडव्याच्या दुरुस्तीसाठी सांडव्याला जॅकेटिंग करणे, गाईडवॉल प्रोव्हाईड करणे, टेल चॅनलचे खोदकाम करणे, आदी कामांचे प्रस्ताव एक वर्षापूर्वीच  मंजुरीसाठी पाठविल्याचे उमरखेडचे जलसंधारण अधिकारी विवेक पिंपोले यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Rainपाऊस