शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर्णी ५०.६, नेर ३९.१, पुसद ५०.८, उमरखेड ११२.१, महागाव ८०.२, वणी १७.२, मारेगाव २४.४, झरी जामणी १३.६, केळापूर २५.५, घाटंजी ४६.१ तर राळेगाव तालुक्यात ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग दुसऱ्या दिवशी यवतमाळ शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले. यवतमाळसह कळंब, उमरखेड आणि महागाव या चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून उमरखेडमध्ये विक्रमी ११२.०१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. तर त्या पाठोपाठ महागावमध्ये ८०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर्णी ५०.६, नेर ३९.१, पुसद ५०.८, उमरखेड ११२.१, महागाव ८०.२, वणी १७.२, मारेगाव २४.४, झरी जामणी १३.६, केळापूर २५.५, घाटंजी ४६.१ तर राळेगाव तालुक्यात ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली. जून-जुलै या महिन्यात जिल्ह्यात साधारण ४२०.६ मिमी पाऊस होतो. बुधवारपर्यंत ५५५.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९२६ मिमी इतकी आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६७०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस ७८.२ टक्के इतका आहे. मागील वर्षी याच तारखेला जिल्ह्यात ६२ टक्के पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात जवळपास २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. मात्र सोमवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आता शेतकरीच संकटात सापडले आहे. कपाशी, सोयाबीन आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे पिके सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची अपेक्षा आहे. 

घानमुख येथे अतिवृष्टीमुळे मातीबांध वाहून गेला- बिजोरा : महागाव तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे घानमुख सिंचन तलाव ओसंडून वाहू लागला. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सांडव्यालगतचा मातीबांध पूर्णतः वाहून गेला आहे. पाण्यामुळे त्या खालील शेती खरडली व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. - सन २००३ मध्ये हा तलाव पूर्णत्वास आला, असे देविदास मोहकर यांनी सांगितले. कालव्याच्या सांडव्याच्या दुरुस्तीसाठी सांडव्याला जॅकेटिंग करणे, गाईडवॉल प्रोव्हाईड करणे, टेल चॅनलचे खोदकाम करणे, आदी कामांचे प्रस्ताव एक वर्षापूर्वीच  मंजुरीसाठी पाठविल्याचे उमरखेडचे जलसंधारण अधिकारी विवेक पिंपोले यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Rainपाऊस