प्रत्येकाने पंचशील अंगीकारावे
By Admin | Updated: February 21, 2016 01:58 IST2016-02-21T01:58:09+5:302016-02-21T01:58:09+5:30
साऱ्या दु:खातून मुक्तीचा मार्ग शोधायचा असेल तर पंचशीलांचे महत्त्व समजून घ्या आणि त्याचा अंगीकार करा,...

प्रत्येकाने पंचशील अंगीकारावे
खेमधम्मो : महागाव येथे अखिल भारतीय धम्म परिषदेचे उद्घाटन
महागाव : साऱ्या दु:खातून मुक्तीचा मार्ग शोधायचा असेल तर पंचशीलांचे महत्त्व समजून घ्या आणि त्याचा अंगीकार करा, असे आवाहन डॉ.भदंत खेमधम्मो यांनी केले. महागाव येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
येथे आयोजित अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी भन्ते राष्ट्रपाल महाथेरो (तेलंगणा) होते. धम्म परिषदेच्या पहिल्याच दिवशी ध्वजारोहण आणि धम्मदेसनेने परिषदेची सुरुवात झाली. निळारंग हा समृद्धीचे लक्षण, पिवळा त्यागाचा, लाल प्रेमाचे प्रतीक, पांढरा जीवनाचे शील जपणारा तर केसरी निष्कलंकतेचे प्रतीक असल्याचे विचार खेमधम्मो यांनी मांडले. हे पाच रंग मिळून पंचशील ध्वज बनलेला आहे. या पंचशीलांचे पालन प्रत्येकाने रोजच्या जीवनात करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सामनेर संघरत्न, रोहीत, शीलरक्षिता यांनी धम्मदेसना दिली. पूज्य भन्तेचा चिवर दान देवून नांदेड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर किशोर भवरे यांनी सन्मान केला.
उद्घाटनप्रसंगी सागर पाईकराव, तथागत कावळे, संजय भगत, श्रीराम राजनकर, विजय कांबळे, तातेराव सरदार, श्रीराम वाठोरे, एम.जी. गायकवाड, प्रल्हाद कावळे, देवराव हरणे, रमेश सांगळे, पुष्पाबाई कावळे, गंगा पाईकराव आदी यावेळी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)