शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

राजकीय टँकरची गर्दी तरीही वाघापूर तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:02 IST

वाघापुरात पाणीटंचाईची सर्वाधिक भयावह स्थिती आहे. नगर परिषद, शिवसेना, भाजपा अन् अपक्ष नगरसेवकाने येथे टँकर सुरू केले आहे. यानंतरही खऱ्या गरजवंतांपर्यंत पाणी पोहचले नाही. यामुळे नागरिक रात्री २ वाजतापर्यंत स्मशानभूमीतील हातपंपावर पाणी भरताना दिसतात.

ठळक मुद्देमजूर वर्गाला पाणी मिळेनास्मशानभूमीतील हातपंप चोरीला‘एअर लिक’वरून महिला भरतात पाणीएकाच वेळी सर्वांचे टँकरनियोजनाअभावी जनसामान्यांचे हाल

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघापुरात पाणीटंचाईची सर्वाधिक भयावह स्थिती आहे. नगर परिषद, शिवसेना, भाजपा अन् अपक्ष नगरसेवकाने येथे टँकर सुरू केले आहे. यानंतरही खऱ्या गरजवंतांपर्यंत पाणी पोहचले नाही. यामुळे नागरिक रात्री २ वाजतापर्यंत स्मशानभूमीतील हातपंपावर पाणी भरताना दिसतात. त्यांच्या मनात प्रशासनाविषयी रोष आहे.यवतमाळ शहरातील राजकीय उलथापालथीचे केंद्रस्थान म्हणून वाघापूरकडे पाहिले जाते. सर्वच पक्षातील ‘अ‍ॅक्टीव’ कार्यकर्ते या भागात आहे. यामुळे सर्वाधिक टँकर या भागाकडे वळते झाले. तरी पाण्याची मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. सोबतच नियोजनचा अभाव आहे. यामुळे झोपडपट्टी वसाहतीत पाणीच पोहचले नाही. यातून दररोज पाण्यासाठी संघर्षाची ठिणगी पडते.वाघापुरातील स्मशानभूमीचा परिसर पाण्याच्या मुबलकतेने परिपूर्ण आहे. या ठिकाणच्या तीन हापशांना मुबलक पाणी आहे. स्मशानाच्या आत दोन तर प्रवेशद्वारावर एक हातपंप आहे. आतील दोन हातपंपांना मुबलक पाणी आहे. यातील एका हातपंपावरील ‘मटघर’ रात्रीतून चोरीला गेले. तेव्हापासून या भागात पाण्याची मोठी मारामार सुरू झाली. एकाही लोकप्रतिनिधीने त्या हातपंपावर ‘मटघर’ बसविले नाही. याचे शल्य या भागातील नागरिकांना आहे. यामुळे पवन कोळकर, राजू गाढवकर, योगेश राठोड यांनी ही हापशी तत्काळ दुरूस्त करावी, अशी कळकळीची विनंती केली. हापशी दुरूस्त झाली तर मग टँकर येवो अथवा न येवो आम्हाला कुठलीही खंत वाटणार नाही, असे ते म्हणाले. पण कोणीही हापशी दुरुस्त केली नाही. दिवसभर काम करावे का पाणी भरावे, हाच आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे. पाण्याशिवाय घर चालत नाही. यामुळे काम आटपून आल्यानंतर पाण्यासाठी पायपीट करावी लागते, असे मारूती उईके म्हणाले.अनिल पुरी शिवाजीनगरात वास्तव्याला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला फेबु्रवारीपासून पाण्यासाठी चटके सहन करावे लागत आहे. नगरपरिषदेचे टँकर त्यांच्या भागाकडे फिरकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आजपर्यंत पाण्यासाठी असे कधीच हाल झाले नाही. खºया अर्थाने रात्रन्दिवस काम करावे लागत आहे. यामुळे नगरातील प्रत्येक नागरिक वैतागला आहे, असे शरद वाघ म्हणाले. १४ एप्रिलला नळ आले. त्यात दोन गुंड पाणी मिळाले. यानंतर पाण्याचा एक थेंबही आला नाही. या भागातून टँकर जाताना दिसतात, मात्र पाणी येत नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.या भागातील गृहिणींनी पाण्यासाठी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. पिण्यासाठी पाण्याचे बॅरल आणू शकत नाही. यामुळे प्राधिकरणाच्या ‘लिक वॉल्व्ह’वरून पाणी भरले जाते. त्यासाठी तासन्तास स्मशानात रात्र जागून काढावी लागते. नगरपरिषद, भाजपा, शिसेना आणि अपक्षाचे टँकर आहेत. इतके टँकर असतानाही गरिबांच्या झोपडीपर्यंत टँकर पोहचतच नाही. टँकरचा वेळ आणि कामाला जाणाºया मजुरांचा वेळ वेगवेगळा आहे. मजूर सकाळीच कामाला जातात. टँकर दुपारी येतो. जे लोक घरी असतात ते पाणी भरतात. मजुरांना पाणीच मिळत नाही, असे ममता भगत आणि मनिषा भगत म्हणाल्या. पाणी वाटपासाठी असणाºया टँकरचे नियोजन नाही. एकाच वेळी सगळे टँकर एकाच लाईनला जातात. नंतर आठ दहा दिवस दिसत नाही. यासाठी सर्वांनी मिळून वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी महिलांनी केली.सकाळी वाटप का नाही?ज्या नागरिकांना पाण्याची गरज आहे, असे लोक घरी नसताना टँकर येतो. हे टँकर कधी येतात याची माहिती नागरिकांना नसते. त्याचे ठराविक वेळापत्रक नाही. यासाठी सकाळी अथवा सायंकाळी पाणी वितरित का केले जात नाही, असा प्रश्न वाघापुरातील नागरिकांनी उपस्थित केला.