शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST

शिंदोला : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी किनाऱ्यावरील तेजापूर आणि गांधीनगर नदी घाटावर पुलाअभावी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वाटसरूंना ...

शिंदोला : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी किनाऱ्यावरील तेजापूर आणि गांधीनगर नदी घाटावर पुलाअभावी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वाटसरूंना पिढ्यानपिढ्या नाहक त्रास सोसावा लागत आहे. या नदीघाटावर पूल निर्माण करण्याची मागणी आहे. मात्र, त्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी स्वातंत्र्याच्या सत्तारीनंतरही दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांना धोक्यात घालून नावेवरून प्रवास करावा लागतो.

वणी तालुक्यातील शेवटच्या टोकाला दक्षिणेकडे पैनगंगेच्या किनाऱ्यावर वसलेलं तेजापूर आणि पैलतीरावर गांधीनगर (कोळसी) गावं. गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात आहे. तालुक्यापासून ४० किलोमीटर दूर अंतरावर असल्याने केवळ कोर्टकचेरी, मालमत्ता खरेदी-विक्री आदी कामासाठी वणीत ग्रामस्थांची येजा असते. तथापि, आरोग्य सुविधेसह अन्य गरजांच्या पूर्ततेसाठी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात लोकांची पूर्वीपासून ये-जा आहे. मात्र, पैनगंगा नदी बारमाही वाहणारी असल्याने गरजूंना नावेवरून प्रवास करावा लागतो. यामुळे पुराच्या वेळी नाव उलटून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळ्यात चंद्रपूर गाठण्यासाठी ३५ किलोमीटर अंतराचा वळसा घेत प्रवास करावा लागतो. परिणामी आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शहरांचा विकास झपाट्याने होत आहेत. मात्र, खेडुतांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. हे दुर्दैवाची बाब आहे. म्हणून नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पैनगंगा किंवा विदर्भा नदीवर कमीतकमी लहान पुलाची तरी निर्मिती करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. सदर पुलाची निर्मिती झाल्यास तेजापूर, आमलोन, चिलई, गांधीनगर, कोळशी, तांबाडी, कोरपना आदी दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांना दिलासा मिळू शकतो. तेजापूर गावाच्या पूर्वेकडून एक मोठा ओढा, विदर्भा नदी आणि दक्षिणेकडून पैनगंगा नदी वाहते. विदर्भा नदी बारमाही वाहणारी नसल्याने हिवाळ्यात, उन्हाळ्यात नदी पार करून देऊरवाडा मार्गे चंद्रपूरला येजा करता येते. मात्र, पावसाळ्यात हा मार्ग बंद होतो. म्हणून चंद्रपूर ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून नावेने प्रवास करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. महेंद्र लोढा यांनी गावालगतच्या ओढ्यावर तात्पुरती व्यवस्था म्हणून लहान पुलाचे बांधकाम केले होते. तथापि, मुसळधार पावसामुळे हा पूल वाहून गेल्याने पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली.

संदीप टोंगे, शेतकरी, तेजापूर