शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अभियंत्याचा भोंगळ कारभार

By admin | Updated: November 10, 2014 22:51 IST

विद्युत पुरवठा नियमित सुरू राहावा, वीज समस्या कायमस्वरूपी सुटाव्या, यासाठी आंदोलने करून मोर्चे काढून, कार्यालयाची तोडफोड करूनही येथे कार्यरत अभियंत्यांना जाग येत नाही.

विजेचा लपंडाव : भारनियमन, कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्तमारेगाव : विद्युत पुरवठा नियमित सुरू राहावा, वीज समस्या कायमस्वरूपी सुटाव्या, यासाठी आंदोलने करून मोर्चे काढून, कार्यालयाची तोडफोड करूनही येथे कार्यरत अभियंत्यांना जाग येत नाही. त्यांना शिविगाळ केल्याशिवाय निद्रीस्थ अभियंत्यांनाच नव्हे तर वरिष्ठांनासुध्दा जाग येत नाही, असा प्रत्यय नागरिकांना येऊ लागला आहे. वीज समस्यांबाबत आत्तापर्यंत अनेकदा ग्राहकांनी शांततेने निवेदने देऊन, विनंती करूनही काहीच उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील वीज ग्राहक प्रचंड त्रस्त झाले आहे. त्यांनी आता पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी काही अनुचित घटना घडल्यास उलट आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे लावले जातात व अधिकारी मोकळे राहतात. मात्र वरिष्ठ अधिकारी आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घेत नाही आणि वीज समस्या सुटतच नाही. बोंबा मारून-मारून अखेर सर्व शांत होतात. असाच येथील संबंधित अभियंत्याचा समज झाला असावा, असे निदर्शनास येत आहे.मारेगाव महावितरणअंतर्गत मारेगाववरून कुंभा फिडरवरील १३ गावांना वीज पुरवठा केला जातो. याच फिडरवरून वेगाव परिसरातील गावांनासुध्दा अतिरिक्त वीज पुरवठा केला जातो. तथापि जंगलातील झाडाझुडूपातून जाणारी वीज वाहिनी सुरळीत राहावी, म्हणून मान्सूनपूर्व ट्री कटींगसह केल्या जाणाऱ्या कामांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. परिणामी वीज वाहिन्यांच्या लोंबकाळणाऱ्या तारा, वाकलेले वीज खांब, रोहित्रांची देखभाल, रोहित्रांवरील अतिरिक्त भार, या विविध कारणांने कुंभा परिसरात वीज पुरवठ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.नादुरूस्त किंवा जळालेली रोहित्रे बदलविण्यास महावितरणकडून कमालीचा विलंब केला जातो. वीज ग्राहक, नागरिक नेहमीच आपल्या वीज समस्या महावितरण कंपनी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, विनंती करून, कधी हातपाय जोडून सांगतात. मात्र त्यांना आश्वासना पलीकडे कोणतीच कामे होताना दिसत नाही. पदाधिकारी, नेते, पुढारी, कार्यकर्त्यांना परिसरातील वीज समस्या माहिती असूनही अभियंत्याच्या चालढकलपणामुळे तेसुद्धा हतबल झाल्याचे दिसून येते. या परिसरासाठी कार्यरत वीज कर्मचारीसुध्दा आता दररोजच्या तक्रारीने वैतागले आहेत.कुंभा फिडरवर दररोज नऊ तासांचे वेळी-अवेळी भारनियमन सुरू आहे. त्यातच इतर वेळी होणारा वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाचा होत असल्याने शेतकरी सिंचन करू शकत नाही. घरगुती मोटारीही चालत नाही. पाणी पुरवठा योजना प्रभावित होतात. परिणामी गावागावांत पाणी समस्या निर्माण झाली आहे. विजेचा लपंडाव आणि कमी-जास्त दाबाने विजेवर चालणारी घरगुती उपकरणे निकामी होत आहेत. पिठ गीरणी चालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भारनियमन करा, पण इतर वेळी होणारा वीज पुरवठा पूर्ण दाबाचा द्या, विजेचा लपंडाव थांबवा, वीज लपंडावाची कारणे शोधा, अभियंता वसुले साहेब वसुली करा, पण पूर्ण वेळ वीज द्या, अशी म्हणण्याची वेळ वीज ग्राहक व शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र महावितरण उपाययोजना करण्यास सतत चालढकलच करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)