शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

कालेश्वर जंगलाला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: April 1, 2015 23:59 IST

कालेश्वर जंगलाला लागूनच अतिक्रमण केले जात आहे. यासाठी जंगलातील मोठमोठी वृक्ष तोडली जात आहे.

पारवा : कालेश्वर जंगलाला लागूनच अतिक्रमण केले जात आहे. यासाठी जंगलातील मोठमोठी वृक्ष तोडली जात आहे. अधिकाधिक जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न अतिक्रमणधारकांकडून केला जात आहे. गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे वन आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. पारवा वन परिक्षेत्रात येत असलेले कालेश्वर जंगल जणू अतिक्रमणधारकांच्या हवाली करण्यात आल्याचे चित्र आहे. जंगलाला लागूनच अतिक्रमण करायचे आणि हळूहळू जंगलातील वृक्षांची तोड करून पसारा वाढवायचा, असा प्रकार सुरू आहे. मौल्यवान वृक्ष कापली जात आहे. त्याची विक्रीही करण्यात येत आहे. अतिक्रमण वाढल्यामुळे जनावरांना चरण्यासाठी जागा नाही. परिणामी परिसरातील पशुधनात घट झाली आहे. दुग्ध उत्पादनही नाममात्र आहे. वृक्षांची कटाई झाली असली तरी वृक्षारोपण मात्र नाममात्र आहे. काही दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या रोपट्यांना पाणी मिळाले नसल्याने ती वाळली. शिवाय जी वाढली ती जनावरांनी फस्त केली. कुठल्याही प्रकारचे संरक्षण या नवीन रोपांना मिळाले नाही. आता तेथे केवळ खड्डे आहेत. महसूल आणि वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. काही जागरूक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरही कारवाई करण्याचे सौजन्य या विभागाकडून दाखविली जात नाही. त्यामुळे या प्रकाराला त्यांचीच मूकसंमती असावी, अशी साधार शंका उपस्थित केली जात आहे. (वार्ताहर)पळसाची झाडे तोडलीकालेश्वर जंगलाला लागून असलेली १८ ते २० पळसाची झाडे तोडून ठेवण्यात आली आहे. मुख्य रस्त्याने जाताना हा प्रकार दृष्टीस पडतो. गेली १५ ते २० दिवसांपासून या बाबीची चौकशी कुणीही केली नाही. संधी मिळताच ती लंपास केली जाणार आहे. तत्पूर्वी या बाबीशी खोलवर तपासणी व्हावी, अशी मागणी आहे.पारवा परिसरात वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वन अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. नियमितपणे गस्त देखील घातली जात नाही. या सर्व बाबींचा लाभ चोरटे उचलत असून लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट करीत आहे.वनविभागाची यंत्रणा मोठ्या प्रमाणात या परिसरात कार्यरत असतानाही वृक्षांची हानी होत आहे. चोरटी वाहतूक होत आहे. यातून वनविभागाचीच या सर्व बाबींना मूक संमती असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. ज्या प्रमाणात झाडे तोडली जात आहे. त्या प्रमाणात त्यांची पुन्हा लागवण होत नसल्याचे दिसते.