शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

कालेश्वर जंगलाला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: April 1, 2015 23:59 IST

कालेश्वर जंगलाला लागूनच अतिक्रमण केले जात आहे. यासाठी जंगलातील मोठमोठी वृक्ष तोडली जात आहे.

पारवा : कालेश्वर जंगलाला लागूनच अतिक्रमण केले जात आहे. यासाठी जंगलातील मोठमोठी वृक्ष तोडली जात आहे. अधिकाधिक जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न अतिक्रमणधारकांकडून केला जात आहे. गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे वन आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. पारवा वन परिक्षेत्रात येत असलेले कालेश्वर जंगल जणू अतिक्रमणधारकांच्या हवाली करण्यात आल्याचे चित्र आहे. जंगलाला लागूनच अतिक्रमण करायचे आणि हळूहळू जंगलातील वृक्षांची तोड करून पसारा वाढवायचा, असा प्रकार सुरू आहे. मौल्यवान वृक्ष कापली जात आहे. त्याची विक्रीही करण्यात येत आहे. अतिक्रमण वाढल्यामुळे जनावरांना चरण्यासाठी जागा नाही. परिणामी परिसरातील पशुधनात घट झाली आहे. दुग्ध उत्पादनही नाममात्र आहे. वृक्षांची कटाई झाली असली तरी वृक्षारोपण मात्र नाममात्र आहे. काही दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या रोपट्यांना पाणी मिळाले नसल्याने ती वाळली. शिवाय जी वाढली ती जनावरांनी फस्त केली. कुठल्याही प्रकारचे संरक्षण या नवीन रोपांना मिळाले नाही. आता तेथे केवळ खड्डे आहेत. महसूल आणि वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. काही जागरूक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरही कारवाई करण्याचे सौजन्य या विभागाकडून दाखविली जात नाही. त्यामुळे या प्रकाराला त्यांचीच मूकसंमती असावी, अशी साधार शंका उपस्थित केली जात आहे. (वार्ताहर)पळसाची झाडे तोडलीकालेश्वर जंगलाला लागून असलेली १८ ते २० पळसाची झाडे तोडून ठेवण्यात आली आहे. मुख्य रस्त्याने जाताना हा प्रकार दृष्टीस पडतो. गेली १५ ते २० दिवसांपासून या बाबीची चौकशी कुणीही केली नाही. संधी मिळताच ती लंपास केली जाणार आहे. तत्पूर्वी या बाबीशी खोलवर तपासणी व्हावी, अशी मागणी आहे.पारवा परिसरात वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वन अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. नियमितपणे गस्त देखील घातली जात नाही. या सर्व बाबींचा लाभ चोरटे उचलत असून लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट करीत आहे.वनविभागाची यंत्रणा मोठ्या प्रमाणात या परिसरात कार्यरत असतानाही वृक्षांची हानी होत आहे. चोरटी वाहतूक होत आहे. यातून वनविभागाचीच या सर्व बाबींना मूक संमती असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. ज्या प्रमाणात झाडे तोडली जात आहे. त्या प्रमाणात त्यांची पुन्हा लागवण होत नसल्याचे दिसते.