शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

कर्मचाऱ्यांचे उपदान, पीएफचे एक हजार कोटी 'एसटी'ने थकविले

By विलास गावंडे | Updated: February 16, 2024 17:48 IST

वर्षभरापासून त्रांगडे : ८० हजार जणांचे आर्थिक नुकसान.

विलास गावंडे, यवतमाळ: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती खराब झाल्याचा आर्थिक फटका सुमारे ८० हजार कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यांच्या उपदानाची आणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम महामंडळाने मागील एक वर्षापासून ट्रस्टकडे भरलेली नाही. ही रक्कम एक हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. कर्मचाऱ्यांची देणी चुकता करण्यासाठी पैसा कमी पडल्यास सरकारने देण्याचे मान्य केले होते. परंतु, सध्या कर्मचाऱ्यांच्या नियमित पगाराची एवढीच रक्कम देऊन बोळवण केली जात आहे.

महामंडळ कर्मचाऱ्यांच्या उपदानाची (ग्रॅच्युइटी) आणि भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम महामंडळाने ट्रस्टमध्ये नियमित जमा करणे गरजेचे आहे. यात अनियमितता आल्यास व्याजाचे नुकसान होते. पर्यायाने कर्मचाऱ्याला आर्थिक फटका बसतो. या रकमेचा वापर कर्मचारी पाल्याचे शिक्षण, वैद्यकीय उपचार आदी बाबींसाठी तातडीची गरज म्हणून करतात. जेवढी अधिक रक्कम जमा असेल तेवढे कर्जही या खात्यावर मिळते. परंतु, ट्रस्टकडे रक्कमच जात नसल्याने जमा खात्याचा आलेख वर सरकत नाही.

महामंडळाकडून नागरिकांसाठी प्रवासात सवलतीच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. दिलेल्या सवलतीची रक्कम शासनाकडून महामंडळाला प्रतिपूर्ती म्हणून देण्यात येते. परंतु सद्य:स्थितीत तरी शासन केवळ कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारासाठी ३२५ ते ३३५ कोटी रुपये देत आहे. महामंडळाला दैनंदिन मिळणाऱ्या उत्पन्नातून डिझेल व इतर खर्च भागवावा लागतो. अशावेळी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी, उपदानाच्या रकमा थकीत राहत आहे.प्रतिपूर्तीची रक्कम मिळावी यासाठी महामंडळाकडून दरमहा शासनाकडे प्रस्ताव पाठविला जातो. त्यावर कार्यवाही मात्र केली जात नाही. शासनाकडे प्रतिपूर्तीचे सुमारे ५०० कोटी रुपये थकीत झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे. महामंडळाला खर्चासाठी पैसा कमी पडल्यास तातडीने पुरविला जाईल, असे शासनाने कर्मचाऱ्याच्या दीर्घकाळ संपाच्या वेळी उच्च न्यायालयात कबूल केले होते. मात्र, त्याचे पालन होत नाही. न्यायालयाचा हा अवमान सहन कसा करून घेतला जात आहे, असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

वेतनवाढ, महागाई भत्त्याचा फरक, घरभाडे थकबाकी आदी आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत. आता उपदान आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कमही थकीत ठेवण्यात आली. हा विषय शासन गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट होत आहे. - श्रीरंग बरगे, सरचिटणी, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :state transportएसटी