शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अकरावी प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून आरंभ

By admin | Updated: June 21, 2014 02:12 IST

जिल्हात दहावीचा निकाला ८३.८५ टक्के लागला असून तब्बल ३१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

यवतमाळ : जिल्हात दहावीचा निकाला ८३.८५ टक्के लागला असून तब्बल ३१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. प्रत्यक्षात २५ हजार विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्याची क्षमता आहे. वाढलेल्या निकालाने विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न आहे. अशा स्थितीत सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यासाठी वाढीव तुकड्यांचा प्रस्ताव शिक्षण संचालकाकडे देण्यात येणार आहे. या संदर्भात संचालकांनी बैठक बोलावली असून २७ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेची सुरूवात होणार आहे. दहावीच्या गुण पत्रिकेचे शाळेतून २६ जून रोजी वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होत असल्याचे प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुरेशसिंग चव्हाण यांनी सांगितले. अतिरिक्त ठरत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यात यावा असे निर्देश जिल्ह्यातील महाविद्यालय प्राचार्यांना दिले आहे. या संदर्भात १८ जून रोजी अभ्यंकर विद्यालयात शिक्षण विभागाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्ह्यातील २०० प्राचार्य उपस्थित होते. विद्यार्थी संख्या लक्षात घेता अकरावीच्या तुकडीतील पटसंख्या वाढविण्याचेही विचाराधीन असल्याने चव्हाण यांनी सांगितले. उच्च माध्यमिक विद्यालयात असलेल्या अकरावी तुकडीमध्ये ६० विद्यार्थी मर्यादा आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी तुकडीत ८० विद्यार्थी तर महाविद्यालयातील अकरावी तुकडीत १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यावर्षी या प्रमाणात आणखी फे रबदल करण्यात येतील. गरज पडल्यास अकरावीच्या तुकड्या वाढविण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकापुढे ठेवण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. याबाबत शिक्षण संचालकांच्या बैठकीत लवकरच तोडगा कढून प्रवेश प्रक्रियेपूर्वीच हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. त्यासाठी तातडीने निर्णय घेतला जाईल असेही चव्हाण यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)