शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

Maharashtra Election 2019 : निवडणुका शहरकेेंद्री, त्यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष- श्रीहरी अणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:12 IST

सध्याच्या निवडणुका केवळ शहरकेंद्री झाल्या आहेत.

यवतमाळ : सध्याच्या निवडणुका केवळ शहरकेंद्री झाल्या आहेत. त्यामुळे अशा निवडणुकांचे ‘आउटपूट’ही शहराभिमुखच असते. निवडून येणा-या राजकीय पक्षांचे खेड्यांकडे दुर्लक्ष होते. विदर्भात शेतकरी आत्महत्या होत असताना नागपुरात मेट्रो सुरू करणे हे त्याचेच द्योतक आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. अणे बोलत होते.विदर्भ राज्य आघाडीचे विधानसभा उमेदवार अ‍ॅड. अमोल बोरखडे यांच्याबाबत भूमिका मांडताना अणे यांनी एकंदरच निवडणुकांबाबत मुद्दे मांडले. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवरच व्हावी. मात्र आज स्थानिक प्रश्नांना कोणताही राजकीय पक्ष महत्त्व देताना दिसत नाही. त्याऐवजी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरच्या मुद्दे पुढे केले जात आहे. राफेल विमानाखाली लिंबू का ठेवले, यातच विरोधी पक्षही डोके खराब करून घेत आहे. मात्र राफेल घोटाळ्याबाबत कोणीही बोलत नाही. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांची बौद्धिक भांडवलाची खोली रिकामी झाली आहे. केवळ भावनिक मुद्द्यांच्या बळावर मते मिळवणे, एवढेच त्यांना कळते. मात्र राजकीय पक्षांनी आपला ‘फोकस’ बदलला नाही, तर ग्रामीण भागात राहणा-या ७० टक्के मतदारांना न्यायच मिळणार नाही. विदर्भ राज्य आघाडीचा उमेदवार मात्र ग्रामीण भागाशी जुळलेला आहे, असे अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले. विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष निरज खांदेवाले यावेळी म्हणाले, आम्ही अनेक समविचारी संघटना एकत्र येऊन विदर्भ निर्माण महामंच तयार केला आहे. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी झाली आहे. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. तर अ‍ॅड. अमोल बोरखडे म्हणाले, विधानसभेत एकमेकांविरुद्ध प्रचार करीत असलेले पक्ष स्थानिक बाजार समितीत, जिल्हा परिषदेत मात्र एकत्र सत्ता भोगत आहे. याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. ‘ते’ उमेदवार म्हणजे, शेंदूर फासलेले दगडकोणताही उमेदवार हा स्वत:च्या पायावर उभा असला पाहिजे. केवळ पक्षश्रेष्ठींनी उभा केलेला माणूस आपल्या मतदारसंघासाठी पात्र असेलच असे नाही. एका पक्षातून दुसरीकडे उड्या मारणारे कोणत्या उपयोगाचे? उमेदवार हा पात्र माणूस असला पाहिजे. पक्षाने उभा केलेला माणूस म्हणजे दगडा शेंदूर फासण्याचा प्रकार आहे, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.जे काश्मिरात झाले, ते विदर्भातही शक्यवेगळा विदर्भ देण्यात दिल्ली सरकार हीच मोठी अडचण आहे. ३७० कलम बदलून जसे काश्मिरचे विभाजन करण्यात आले, त्याच प्रमाणे घटनेतील तरतुदी वापरून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे शक्य आहे. विदर्भच काय, बुंदेलखंड, गोरखालँड या अविकसित भागांनाही स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे शक्य आहे. मात्र, मोदी-शहांची इच्छा नसेल, तर कोणीही वेगळा विदर्भ देऊ शकत नाही. फडणवीस-गडकरी यांच्याही शब्दाला दिल्लीत वजन नाही, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019