शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

Maharashtra Election 2019 : निवडणुका शहरकेेंद्री, त्यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष- श्रीहरी अणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:12 IST

सध्याच्या निवडणुका केवळ शहरकेंद्री झाल्या आहेत.

यवतमाळ : सध्याच्या निवडणुका केवळ शहरकेंद्री झाल्या आहेत. त्यामुळे अशा निवडणुकांचे ‘आउटपूट’ही शहराभिमुखच असते. निवडून येणा-या राजकीय पक्षांचे खेड्यांकडे दुर्लक्ष होते. विदर्भात शेतकरी आत्महत्या होत असताना नागपुरात मेट्रो सुरू करणे हे त्याचेच द्योतक आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. अणे बोलत होते.विदर्भ राज्य आघाडीचे विधानसभा उमेदवार अ‍ॅड. अमोल बोरखडे यांच्याबाबत भूमिका मांडताना अणे यांनी एकंदरच निवडणुकांबाबत मुद्दे मांडले. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवरच व्हावी. मात्र आज स्थानिक प्रश्नांना कोणताही राजकीय पक्ष महत्त्व देताना दिसत नाही. त्याऐवजी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरच्या मुद्दे पुढे केले जात आहे. राफेल विमानाखाली लिंबू का ठेवले, यातच विरोधी पक्षही डोके खराब करून घेत आहे. मात्र राफेल घोटाळ्याबाबत कोणीही बोलत नाही. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांची बौद्धिक भांडवलाची खोली रिकामी झाली आहे. केवळ भावनिक मुद्द्यांच्या बळावर मते मिळवणे, एवढेच त्यांना कळते. मात्र राजकीय पक्षांनी आपला ‘फोकस’ बदलला नाही, तर ग्रामीण भागात राहणा-या ७० टक्के मतदारांना न्यायच मिळणार नाही. विदर्भ राज्य आघाडीचा उमेदवार मात्र ग्रामीण भागाशी जुळलेला आहे, असे अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले. विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष निरज खांदेवाले यावेळी म्हणाले, आम्ही अनेक समविचारी संघटना एकत्र येऊन विदर्भ निर्माण महामंच तयार केला आहे. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी झाली आहे. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. तर अ‍ॅड. अमोल बोरखडे म्हणाले, विधानसभेत एकमेकांविरुद्ध प्रचार करीत असलेले पक्ष स्थानिक बाजार समितीत, जिल्हा परिषदेत मात्र एकत्र सत्ता भोगत आहे. याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. ‘ते’ उमेदवार म्हणजे, शेंदूर फासलेले दगडकोणताही उमेदवार हा स्वत:च्या पायावर उभा असला पाहिजे. केवळ पक्षश्रेष्ठींनी उभा केलेला माणूस आपल्या मतदारसंघासाठी पात्र असेलच असे नाही. एका पक्षातून दुसरीकडे उड्या मारणारे कोणत्या उपयोगाचे? उमेदवार हा पात्र माणूस असला पाहिजे. पक्षाने उभा केलेला माणूस म्हणजे दगडा शेंदूर फासण्याचा प्रकार आहे, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.जे काश्मिरात झाले, ते विदर्भातही शक्यवेगळा विदर्भ देण्यात दिल्ली सरकार हीच मोठी अडचण आहे. ३७० कलम बदलून जसे काश्मिरचे विभाजन करण्यात आले, त्याच प्रमाणे घटनेतील तरतुदी वापरून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे शक्य आहे. विदर्भच काय, बुंदेलखंड, गोरखालँड या अविकसित भागांनाही स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे शक्य आहे. मात्र, मोदी-शहांची इच्छा नसेल, तर कोणीही वेगळा विदर्भ देऊ शकत नाही. फडणवीस-गडकरी यांच्याही शब्दाला दिल्लीत वजन नाही, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019