शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

Education: सरकारी शाळांचे तीन लाख विद्यार्थी घटले, पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले

By अविनाश साबापुरे | Updated: July 24, 2023 15:42 IST

Education News: गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून तब्बल तीन लाख ७६८ विद्यार्थी घटल्याची गंभीर बाब यू-डायसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ - कोरोना संकटानंतर अनेक विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्या. त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या शाळांवर झाला. गेल्या वर्षभरात या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून तब्बल तीन लाख ७६८ विद्यार्थी घटल्याची गंभीर बाब यू-डायसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे.

केंद्र शासनाने दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी यू-डायस प्लस प्रणालीवर करून घेतली आहे. त्यानुसार, सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून ५१ लाख २३ हजार ९५५ विद्यार्थी दाखल होते. परंतु, शासनाने या आकडेवारीची तुलना २०२१-२२ या सत्रातील माहितीशी केली असता, वर्षभरात तब्बल तीन लाखांवर विद्यार्थ्यांची घट दिसून आली आहे. विद्यार्थी संख्येमध्ये दरवर्षीच थोडीबहुत घट किंवा वाढ दिसून येते. परंतु एकाच वर्षात तीन लाख विद्यार्थी घटल्याने शिक्षण विभागाची झोप उडाली आहे. महाराष्ट्रातील शाळांनी या तीन लाख विद्यार्थ्यांची माहिती यू-डायसवर भरली किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसल्याने ते प्रणालीत नोंदविले गेले नाहीत का, असाही प्रश्न आहे. परंतु, शिक्षण क्षेत्रातील काही जाणकारांच्या मते कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना अनेक शाळांनी बोगस विद्यार्थ्यांची माहिती यू-डायसवर भरली. काही शाळांनी एकाच विद्यार्थ्याला दोन-दोन शाळेच्या पटावर दाखविण्याचाही प्रकार केला आहे. त्यामुळे यू-डायसच्या ताज्या आकडेवारीतून हे विद्यार्थी बाद झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबई उपनगरमध्ये १४ हजार ८७१ आणि पुणे जिल्ह्यात ९ हजार ३२९ विद्यार्थी सरकारी शाळेत वाढलेले आहेत. तसेच राज्यातील नागपूर, चंद्रपूर, नांदेड, नाशिक, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, सांगली या महापालिका शाळांमध्ये २१ हजार ७३८ विद्यार्थी वाढले आहेत.

खात्री करा, विद्यार्थी शोधा !यू-डायसमध्ये तब्बल तीन लाख विद्यार्थी कमी दिसत असल्याने समग्र शिक्षाचा चालू वर्षातील निधी नेमका कसा खर्च करावा, हा पेच प्राथमिक शिक्षण परिषदेपुढे निर्माण होणार आहे. गणवेश, पुस्तके व इतर विद्यार्थी लाभाच्या निधीवर या घटीचा परिणाम होणार आहे. त्यामुळेच परिषदेने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत अलर्ट करणारे पत्र तातडीने रवाना केले आहे. सर्व शाळांना सूचना देऊन शाळानिहाय विद्यार्थी संख्येची खात्री करा. राहिलेले विद्यार्थी शोधा, ज्या विद्यार्थ्यांची माहिती शाळांनी यू-डायसमध्ये भरलेली नसेल, ती तातडीने भरा, असे निर्देश या पत्रात देण्यात आले आहे.

 कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थी घटले?जिल्हा : २०२२ : २०२३नंदूरबार : १,०३,२६३ : ९८,१८८धुळे : १,००,०६४ : ९०,९३१जळगाव : २,०२,२२२ : १,८९,८५३बुलडाणा : १,८५,६५३ : १,७३,७७२अकोला : ८६,१२९ : ७८,२८१वाशिम : ७९,२९२ : ७१,८५७अमरावती : १,४४,२८२ : १३७,५२५वर्धा : ५४,६९१ : ५२,५३६नागपूर : १,०५,३२४ : १,०१,९५१भंडारा : ७७,०७० : ७५३९३गोंदिया ८९४४१ : ८६५१३गडचिरोली ७२९९७ : ७१३८५चंद्रपूर १,०९,३२५ : १,०३,९४१यवतमाळ १,९४,६६३ : १,७७,८३५नांदेड २,२३,६३५ : १,९८,४५५हिंगोली १,०२,९२१ : ९२,५७७परभणी १,३२,७८६ : १,१८,८८०जालना १,६३,६२५ : १,४६,०६१संभाजीनगर २,४२,६८४ : २,१७, ३९८नाशिक ३,२७,५१० : ३,१४,५०६ठाणे २,०२,४८८ : १,९५,५३३मुंबई उपनगर २,९२,८२५ : ३,०७,६९६रायगड १,०४,०३७ : १,००,४१८पुणे ३,८४,२२० : ३,९३,५४९अहमदनगर २,३४,२३३ : २,२३,७४२बिड १,८१,२५२ : १,६०,२०५लातूर १,२५,०४५ : १,०७,४१४धाराशिव १,१६,२१३ : १,०६,८२५सोलापूर २,२५,९५३ : २,१०,७०९सातारा १,४०,१८२ : १,३१,१३२रत्नागिरी ७५,१६९ : ७०,५३९सिंधुदुर्ग ३६,७५७ : ३४,९९७कोल्हापूर १,९७,५३८ : १,८५,४४३सांगली १,३२,२२७ : १,२६,०४९पालघर १,७९,००७ : १,७१,८६६

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र