शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८८ लाख हेक्टरची ई-पीक नोंदणी बाकी; ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:46 IST

Yavatmal : प्रत्यक्ष शेतात पोहोचल्यावर संदेश मिळतो, तुम्ही कार्य क्षेत्राबाहेर आहात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माझी शेती माझा सातबारा मी नोंदविणार पिकांचा पेरा, या ब्रीदवाक्याला धरून राज्य शासनाने ई-पीक नोंदणी बंधनकारक केली. यासाठी २० सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. प्रत्यक्षात या कालावधीत राज्यभरात ४७ टक्के एवढीच ई-पीक नोंदणी झाली. नोंदणी प्रक्रियेत वारंवार तांत्रिक अडचणी येत आहे. यामुळे राज्यातील ८८ लाख हेक्टर क्षेत्र नोंदणी प्रक्रियेपासून दूर आहेत. यामुळे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमीअभिलेख कार्यालयाने ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत वाढविल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया राबविताना व्हर्जन थ्री हे सुधारित सॉफ्टवेअर अमलात आणले आहे. यामध्ये शेतशिवारात पोहचल्यानंतरच पिकांची नोंद घेतली जाणार आहे. अक्षांश-रेखांश याचा मेळ होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शेतकरी स्वतःच्या शेतात पोहचल्यानंतर ही अक्षांश-रेखांश दाखवित नाही. यामुळे शेती पिकांच्या नोंदीच घेतल्या जात नाही. तुम्ही कार्य क्षेत्राबाहेर आहत, असा संदेश मिळतो. त्यामुळे निम्मे शेतकरी अडचणीत आले आहेत. काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना ई-पिकाची नोंद करता आली नाही. 

४९ हजार सहायक पोहोचणार मदतीला

शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी मुदत संपल्यानंतर राहिलेल्या पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी सहायकांवर जबाबदारी दिली जाणार आहे. यासाठी ४९ हजार ३६६ सहायकांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीत मोलाचा हातभार लागणार आहे.

केवळ ८१ लाख हेक्टरवरच्या नोंदी

राज्यात पेरणीयोग्य क्षेत्र १ कोटी ६९ लाख हेक्टरचे आहे. यापैकी ई-पीक पाहणी प्रयोगात ८१ लाख ४ हजार हेक्टरच्या नोंदी झाल्या. तर ८८ लाख हेक्टरच्या नोंदी अजून बाकी आहेत. एकूण क्षेत्राच्या ४७ टक्के क्षेत्रावर ह्या नोंदी झाल्या आहेत. अजून ५३ टक्के क्षेत्रावरील नोंदी बाकी आहेत. 

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरीfarmingशेती