शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

कोरोनाच्या धास्तीतही पालिकेच्या गुरुजींची ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

नगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्या घोषित केल्या. नंतर हा आदेश खेड्यापाड्यातील शाळांनाही लागू करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये मात्र शिक्षकांनी सुटी घ्यावी की शाळेत यावे याबाबत संभ्रम होता. त्यावरही बरीच ओरड झाल्यानंतर शिक्षणाधिकारी दीपक चवने यांनी बुधवारी पत्र काढून शिक्षकांनीही घरीच थांबण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देयवतमाळातील प्रकार : सकाळी ८ ते ११ हजेरी अनिवार्य केली, शिक्षकांच्या संतापानंतर प्रशासन नरमले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरातील सर्व शाळांना सुटी दिली आहे. मात्र अशाही परिस्थितीत यवतमाळ नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांना हजर रहावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संताप आणि समाजात संसर्गाचा धोका वाढला आहे.नगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्या घोषित केल्या. नंतर हा आदेश खेड्यापाड्यातील शाळांनाही लागू करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये मात्र शिक्षकांनी सुटी घ्यावी की शाळेत यावे याबाबत संभ्रम होता. त्यावरही बरीच ओरड झाल्यानंतर शिक्षणाधिकारी दीपक चवने यांनी बुधवारी पत्र काढून शिक्षकांनीही घरीच थांबण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आता शाळेत जाणे टाळले आहे.मात्र यवतमाळ नगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबत कोणतेही निर्देश दिले नाही. उलट सकाळी ८ ते ११ पर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविले. सोमवार ते गुरुवार असे सलग चारही दिवस जिल्हाधिकाऱ्यांचा, शिक्षणाधिकाºयांचा आदेश डावलून पालिकेच्या शिक्षकांना शाळेत येऊन बसावे लागत आहे. दरम्यान शाळेत येण्याविषयी नगरपालिकेने जबरदस्ती केलेली नाही. मात्र मुख्याध्यापक आम्हाला येण्याविषयी आग्रह धरत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्याचवेळी पुसदसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी मात्र पत्र काढून शिक्षकांनाही सुटी दिली आहे. यवतमाळातच शाळेची सक्ती का असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालिका म्हणते, सक्ती नाही, जागृती करतोयदरम्यान नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ म्हणाले, शाळेत येण्याविषयी शिक्षकांवर सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र कोरोनाविषयक जनजागृतीसाठी शिक्षक उपलब्ध असावे हा पालिकेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे आमचे शिक्षकही आपआपल्या परिसरातील नागरिकांमध्ये कोरोना टाळण्याच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करीत आहे. नगरपालिका शाळा परिसरातील नागरिकांना स्वच्छ हात धुण्याची सुविधा शाळांमार्फत उपलब्ध केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTeacherशिक्षक