शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

13 हजार हेक्टरवरील धूळ पेरणी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच  स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामान विभागाने यावर्षी वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आणि शेतकरी पेरणीला लागले. पाऊस बरसायच्या आधीच १३ हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी आटोपली. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस लांबला. त्यामुळे धूळ पेरणी उलटण्याचा धाेका वाढला आहे. जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच  स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.विजेच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, वीजही अनेक भागात गूल राहात असल्याने ओलिताची सोय उरली नाही. अनेक शेतकऱ्यांना अर्धवट पाणी देता आले आहे. अपुऱ्या पाण्यात कपाशीचे बियाणे अंकुरले. मात्र, आता पावसाअभावी कोंब पिवळे पडत आहेत.  यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याचा धोका आहे. मान्सूनची आगेकूच संथगतीने असल्याने अजूनही १०० मि.मी. पाऊस झाला नाही. अशा स्थितीत पेरणी उलटण्याचा धोका वाढला आहे. पुसद, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ,  दारव्हा, आर्णी, राळेगाव, पांढरकवडा आणि घाटंजी तालुक्यात कापसाची लागवड केली आहे. 

हवामान विभागाच्या अंदाजाने घात- गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. काही शेतकऱ्यांनी एकरी उत्पन्न वाढावे म्हणून लवकर टोबणी केली. काहींनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी धावपळ केली. ही संपूर्ण घाई शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करावी. अधिक घाई झाली, तर त्याचा विपरित परिणाम होईल. शेतकऱ्यांनी पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी. - नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस