शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

13 हजार हेक्टरवरील धूळ पेरणी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच  स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामान विभागाने यावर्षी वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आणि शेतकरी पेरणीला लागले. पाऊस बरसायच्या आधीच १३ हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी आटोपली. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस लांबला. त्यामुळे धूळ पेरणी उलटण्याचा धाेका वाढला आहे. जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच  स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.विजेच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, वीजही अनेक भागात गूल राहात असल्याने ओलिताची सोय उरली नाही. अनेक शेतकऱ्यांना अर्धवट पाणी देता आले आहे. अपुऱ्या पाण्यात कपाशीचे बियाणे अंकुरले. मात्र, आता पावसाअभावी कोंब पिवळे पडत आहेत.  यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याचा धोका आहे. मान्सूनची आगेकूच संथगतीने असल्याने अजूनही १०० मि.मी. पाऊस झाला नाही. अशा स्थितीत पेरणी उलटण्याचा धोका वाढला आहे. पुसद, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ,  दारव्हा, आर्णी, राळेगाव, पांढरकवडा आणि घाटंजी तालुक्यात कापसाची लागवड केली आहे. 

हवामान विभागाच्या अंदाजाने घात- गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. काही शेतकऱ्यांनी एकरी उत्पन्न वाढावे म्हणून लवकर टोबणी केली. काहींनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी धावपळ केली. ही संपूर्ण घाई शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करावी. अधिक घाई झाली, तर त्याचा विपरित परिणाम होईल. शेतकऱ्यांनी पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी. - नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस