शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वणीतील धूळ आणि धूर प्रदूषणाने मानवी जीवन धोक्यात; खाण बाधित क्षेत्रात गंभीर आजार बळावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:04 IST

उपाययोजनाच नाही

संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ) : कोळसा उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीमुळे वणी परिसरात धूळ प्रदूषणाचा प्रंचड प्रकोप पहायला मिळतो. यासोबत या भागात असलेल्या चुना भट्ट्यांच्या धुरांड्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर पशुधन आणि शेती व्यवसायदेखील धोक्यात आला आहे. असे असताना याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वणी तालुक्यातील गावांची संख्या १६२ आहे. मात्र, कोळसा खाणी व अन्य उद्योगांमुळे १०२ गावे बाधित झाली आहेत. या गावकऱ्यांना अनंत अडचणी, समस्यांचा सामना करावा लागत आहे. १२ कोळसा खाणी आहेत. या खाणीतील कोळसा उत्खनन आणि त्याची वाहतूक यामुळे धूळ प्रदूषणात मोठी भर पडत आहेत. मुळात धुळीचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी वेकोलिची असताना वेकोलि मात्र थातूरमातूर उपाययोजना करीत असल्याचे विदारक चित्र वणी तालुक्यात पहायला मिळते. धुळीचे व्यवस्थापन करण्यासाठी डस्ट अरेस्टरचा वापर करायला हवा. मात्र, ती यंत्रणाच वेकोलिकडे नाही. किंबहुना ती असेल तरी त्याचा वापर न करता धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ जलसिंचन केले जाते. कोळसा वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोळशाची धूळ साचते. यावर पाणी मारल्यानंतर तेथे चिखल तयार होतो. त्यामुळे दुचाकींचे अपघात घडतात. रस्त्यावर पाणी मुरते. त्यातून रस्ते फुटतात.

हजाराे हेक्टर शेतजमीन बंजर

धूळ प्रदूषणामुळे कोळसा वाहतुकीच्या रस्त्यावरील हजारो हेक्टर शेतजमीन बंजर झाली आहे. या जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे. पिकांवर कोळशाची धूळ बसल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. त्यातून पिकांच्या उत्पादनात घट येते. दरवर्षीच या भागातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते. असे असताना बाधित शेतकऱ्यांना वेकोलिकडून नुकसानीचा मोबदला म्हणून एक छदामही मदत दिला जात नाही.

विविध आजारांची बाधा

धूळ प्रदूषणामुळे दमा, त्वचा रोग, पोटाचे विकार, दृष्टीदोष, बहिरेपणा या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचा पशुधनावरदेखील परिणाम होत आहे. कोळसा वाहतुकीमुळे जनावरांच्या चाऱ्यावर धूळ बसते. पाळीव जनावरे मग हाच चारा खातात. त्यातून त्यांना वेगवेगळे आजार जडत आहेत.

प्रोसोपीस, ज्युलीफ्लोरा वनस्पती धोकादायक

कोळसा उत्खननानंतर खाणीतून निघणाऱ्या मातीचे अजस्र ढिगारे वणी तालुक्यात उभे करण्यात आले आहेत. नियमानुसार, या ढिगाऱ्यांवर हरित पट्टा तयार करण्यासाठी कडुनिंब, सीसू, आवळा, आंबा, कदंब, जांभूळ, बेहडा, बदाम यासारखी झाडे लावणे अपेक्षित होते. मात्र, वेकोलिने अशा कोणत्याही झाडांची लागवड केल्याचे दिसून येत नाही. याउलट धोकादायक असलेली प्रोसोपीस, ज्युलीफ्लोरा ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर खाण क्षेत्रात उगवली आहे. या घनदाट वनस्पतींमुळे वणी परिसरात वाघांचा संचार वाढला आहे. सोबतच इतरही हिंस्र जनावरांची संख्या वाढीस लागली आहे.

चुनाभट्ट्यांच्या धुराने गावकरी बेजार

वणीपासून अगदी जवळ असलेल्या राजूर कॉलरी येथे ५० पेक्षा अधिक चुनाभट्ट्या आहेत. यापैकी आता १२ चुनाभट्ट्या सुरू आहेत. या चुनाभट्ट्याच्या धुरांड्यातून निघणाऱ्या धुरामुळे केवळ राजूर कॉलरी येथीलच नाही तर अवतीभोवतीची आठ ते १० गावे बेजार आहेत. या नागरिकांना २४ तास या धुराचा सामना करावा लागत आहे.

कोळशाची वाहतूक होणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. खाणीलगतची गावेही प्रदूषणाने बेजार आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यासाठी आपत्तीच्या धर्तीवर वेकोलिने धोरण ठरवायला हवे. खाण बाधित क्षेत्रातील नागरिकांची नियमितपणे आरोग्य तपासणी करून त्यांच्या उपचाराचा खर्चदेखील वेकोलिने सीएसआर फंडातून करायला हवा.

विजय पिदूरकर, माजी सदस्य खनिज विकास प्रतिष्ठान.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणYavatmalयवतमाळ