शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील धूळ आणि धूर प्रदूषणाने मानवी जीवन धोक्यात; खाण बाधित क्षेत्रात गंभीर आजार बळावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:04 IST

उपाययोजनाच नाही

संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ) : कोळसा उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीमुळे वणी परिसरात धूळ प्रदूषणाचा प्रंचड प्रकोप पहायला मिळतो. यासोबत या भागात असलेल्या चुना भट्ट्यांच्या धुरांड्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर पशुधन आणि शेती व्यवसायदेखील धोक्यात आला आहे. असे असताना याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वणी तालुक्यातील गावांची संख्या १६२ आहे. मात्र, कोळसा खाणी व अन्य उद्योगांमुळे १०२ गावे बाधित झाली आहेत. या गावकऱ्यांना अनंत अडचणी, समस्यांचा सामना करावा लागत आहे. १२ कोळसा खाणी आहेत. या खाणीतील कोळसा उत्खनन आणि त्याची वाहतूक यामुळे धूळ प्रदूषणात मोठी भर पडत आहेत. मुळात धुळीचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी वेकोलिची असताना वेकोलि मात्र थातूरमातूर उपाययोजना करीत असल्याचे विदारक चित्र वणी तालुक्यात पहायला मिळते. धुळीचे व्यवस्थापन करण्यासाठी डस्ट अरेस्टरचा वापर करायला हवा. मात्र, ती यंत्रणाच वेकोलिकडे नाही. किंबहुना ती असेल तरी त्याचा वापर न करता धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ जलसिंचन केले जाते. कोळसा वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोळशाची धूळ साचते. यावर पाणी मारल्यानंतर तेथे चिखल तयार होतो. त्यामुळे दुचाकींचे अपघात घडतात. रस्त्यावर पाणी मुरते. त्यातून रस्ते फुटतात.

हजाराे हेक्टर शेतजमीन बंजर

धूळ प्रदूषणामुळे कोळसा वाहतुकीच्या रस्त्यावरील हजारो हेक्टर शेतजमीन बंजर झाली आहे. या जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे. पिकांवर कोळशाची धूळ बसल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. त्यातून पिकांच्या उत्पादनात घट येते. दरवर्षीच या भागातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते. असे असताना बाधित शेतकऱ्यांना वेकोलिकडून नुकसानीचा मोबदला म्हणून एक छदामही मदत दिला जात नाही.

विविध आजारांची बाधा

धूळ प्रदूषणामुळे दमा, त्वचा रोग, पोटाचे विकार, दृष्टीदोष, बहिरेपणा या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचा पशुधनावरदेखील परिणाम होत आहे. कोळसा वाहतुकीमुळे जनावरांच्या चाऱ्यावर धूळ बसते. पाळीव जनावरे मग हाच चारा खातात. त्यातून त्यांना वेगवेगळे आजार जडत आहेत.

प्रोसोपीस, ज्युलीफ्लोरा वनस्पती धोकादायक

कोळसा उत्खननानंतर खाणीतून निघणाऱ्या मातीचे अजस्र ढिगारे वणी तालुक्यात उभे करण्यात आले आहेत. नियमानुसार, या ढिगाऱ्यांवर हरित पट्टा तयार करण्यासाठी कडुनिंब, सीसू, आवळा, आंबा, कदंब, जांभूळ, बेहडा, बदाम यासारखी झाडे लावणे अपेक्षित होते. मात्र, वेकोलिने अशा कोणत्याही झाडांची लागवड केल्याचे दिसून येत नाही. याउलट धोकादायक असलेली प्रोसोपीस, ज्युलीफ्लोरा ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर खाण क्षेत्रात उगवली आहे. या घनदाट वनस्पतींमुळे वणी परिसरात वाघांचा संचार वाढला आहे. सोबतच इतरही हिंस्र जनावरांची संख्या वाढीस लागली आहे.

चुनाभट्ट्यांच्या धुराने गावकरी बेजार

वणीपासून अगदी जवळ असलेल्या राजूर कॉलरी येथे ५० पेक्षा अधिक चुनाभट्ट्या आहेत. यापैकी आता १२ चुनाभट्ट्या सुरू आहेत. या चुनाभट्ट्याच्या धुरांड्यातून निघणाऱ्या धुरामुळे केवळ राजूर कॉलरी येथीलच नाही तर अवतीभोवतीची आठ ते १० गावे बेजार आहेत. या नागरिकांना २४ तास या धुराचा सामना करावा लागत आहे.

कोळशाची वाहतूक होणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. खाणीलगतची गावेही प्रदूषणाने बेजार आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यासाठी आपत्तीच्या धर्तीवर वेकोलिने धोरण ठरवायला हवे. खाण बाधित क्षेत्रातील नागरिकांची नियमितपणे आरोग्य तपासणी करून त्यांच्या उपचाराचा खर्चदेखील वेकोलिने सीएसआर फंडातून करायला हवा.

विजय पिदूरकर, माजी सदस्य खनिज विकास प्रतिष्ठान.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणYavatmalयवतमाळ